शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन उद्योगाची लागली वाट

By admin | Updated: May 25, 2014 01:32 IST

मुजीब देवणीकर , आर्कलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया , महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे औरंगाबादेतील पर्यटन उद्योगाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबाद आर्कलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया (एएसआय), महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि राज्य पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे औरंगाबादेतील पर्यटन उद्योगाची अक्षरश: वाट लागल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. केंद्र तथा राज्य शासनाच्या भोंगळ कारभारामुळे औरंगाबादेत पर्यटकांची संख्या तब्बल पन्नास लाखांनी कमी झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये पर्यटन व्यवसायाला एवढे बिकट दिवस कधी पाहण्याची वेळ आली नव्हती. पर्यटन उद्योगाची यंदा वाट लागल्याने तब्बल शंभर कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. ऐतिहासिक औरंगाबादेत पर्यटकांनी का आणि कशासाठी यावे, असा प्रश्न पडला आहे. पर्यटक वाढावेत, पर्यटकांना दर्जेदार सेवा- सुविधा मिळाव्यात, शहर सुंदर, स्वच्छ दिसावे, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी चांगली परिवहन व्यवस्था, कोठेही कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मागील दहा वर्षांमध्ये पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत होती. २०१२-१३ मध्ये देशी पर्यटक ४३ लाख १३ हजार, तर विदेशी पर्यटक ९६ हजार ९०० आले होते. २०१३-१४ मध्ये देशी पर्यटक ३८ हजार, तर विदेशी पर्यटक ७६ हजार आले. मागील वर्षीच्या तुलनेत पर्यटकांचा आकडा झपाट्याने खाली येत आहे. एवढे होऊनही शासकीय कार्यालयांना कोणतीच चिंता नाही. औरंगाबादेतील ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक वास्तू जपण्याचे कामही शासकीय कार्यालयांना करता येत नाही. दौलताबाद, अजिंठा, वेरूळ, खुलताबाद, पाणचक्की कुठेही पर्यटकांनी पाय ठेवला तर अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळते. अनेक पर्यटन स्थळांवर तर पर्यटकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी घोटभर पाणीही मिळत नाही. शहरातील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी यावे तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. जनशताब्दी एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे सोडली तर पर्यटकांना सोयीची एकही रेल्वे नाही. औरंगाबादेतून जेव्हा पर्यटकांना जाण्याची वेळ येते तेव्हा रेल्वेची बुकिंग मिळत नाही. दलाल पर्यटकांना अक्षरश: लुटून खातात. बाबा पेट्रोलपंपावर पहाटे चार वाजता पर्यटक उतरल्यावर त्यांना रिक्षाचालक कशा पद्धतीने गराडा घालतात. मुंबईहून जेवढे पैसे देऊन पर्यटक येतो, त्यापेक्षा दुप्पट पैसे रिक्षाचालक त्याला मागतात. शहरात पाय ठेवताच पर्यटकाला असे वाटते की, कशाला मरायला या शहरात आलो...! मोठ्या हिमतीने आणि उत्साहाने तो दुसर्‍या दिवशी विविध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी निघतो. तेथेही पावला-पावलाला त्याला वाईट अनुभव येतो. औरंगाबादेत पर्यटकांची संख्या घटण्याचे कारण एक नाही, तर अनेक कारणे आहेत. पर्यटकांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम या शहराने कधीच केले नाही. मागील दहा वर्षांमध्ये फक्त पर्यटन उद्योगाला नशिबाचीच साथ मिळाली म्हणावे लागेल. यापुढे पर्यटन उद्योगाला चांगले दिवस आणायचे असतील तर त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील.अजिंठा-वेरूळ महोत्सवासारखे कार्यक्रम वारंवार घेण्यात यावेत. पर्यटनासाठी कोणतेही धोरण तयार करण्यात आलेले नाही. शहरात स्वतंत्र पर्यटन पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. ऐतिहासिक शहरात रस्ते आणि स्वच्छता चांगली असावी. पर्यटकांच्या सुविधेकरिता तिकिटांसाठी एक खिडकी योजना हवी. रेल्वेस्टेशनच्या इमारतीत एमटीडीसीचे केंद्र असावे.पर्यटन विकासासाठी आकर्षक पॅकेजची गरज. कलाग्राममध्ये जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजेत. राजस्थान, केरळप्रमाणे पर्यटन धोरण असावे. पर्यटन उद्योगातील नागरिक, व्यावसायिकांना प्रशिक्षणाची गरज. ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाची जबाबदारी खासगी कंपन्यांना द्यावी. ९५ कोटींचे व्हिजिटर्स सेंटर अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पांतर्गत जपान सरकारच्या आर्थिक साह्याने तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करून दोन व्हिजिटर्स सेंटर उभारण्यात आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे अभ्यागत केंद्र ज्या पद्धतीने सुरू झाले पाहिजे तसे सुरूच झाले नाही. त्यामुळे ९५ कोटी रुपये पाण्यात गेले की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कशाचा पुरातत्व विभाग शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा सत्यानाश करण्यात एएसआय, राज्य पुरातत्व विभागाचा मोठा वाटा आहे. दिल्लीगेटवर मोठमोठी झाडे वाढली आहेत. अशीच परिस्थिती मकाईगेटवर आहे. या गेटवर वाढणार्‍या झाडांना हे विभाग काढून टाकू शकत नाहीत, तर मोठ्या वास्तूंची देखभाल कितपत करीत असतील, असा प्रश्न शहरातील इतिहासप्रेमींनी उपस्थित केला आहे. परिवहन सुविधांचा अभाव पर्यटकांना अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद येथे फिरण्यासाठी खाजगी वाहनच घ्यावे लागते. शासनातर्फे वाहन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ट्रॅव्हल एजंट किंवा इतर टॅक्सीचालकांसोबत सौहार्दपूर्ण असे वातावरण तयार केले नाही.देशांतर्गत पर्यटक देशी पर्यटकांकडे शासकीय कार्यालयांचे अजिबात लक्ष नाही. औरंगाबादेत सर्वात जास्त देशी पर्यटक आंध्र प्रदेशातून येतात. त्यानंतर पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक असा देशी पर्यटकांचा उतरता क्रम लागतो.विदेशी पर्यटक एकेकाळी महाराष्टÑात विशेषत: औरंगाबादेत सर्वाधिक जपानी पर्यटक मोठ्या संख्येने येत असत. मागील काही वर्षांमध्ये जपानी पर्यटकांचा ओघ झपाट्याने कमी झाला आहे. वास्तविक पाहता अजिंठा आणि वेरूळचे सर्वाधिक आकर्षण जपानी पर्यटकांनाच आहे. सध्या अमेरिकेचे पर्यटक शहरात बरेच येत आहेत. त्यापाठोपाठ फ्रान्स, जपान, स्पेन आणि अलीकडे कोरिया, थायलंड, श्रीलंका येथूनही पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठे प्रकल्प मराठवाड्याच्या बाहेर पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत केंद्र आणि राज्य शासनाकडून एकही मोठा प्रकल्प कार्यान्वित होत नाही. अलीकडेच सिंधुदुर्गसाठी ‘सी वर्ल्ड’ हा पाच हजार कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. असे अनेक प्रकल्प मुंबई आणि कोकण विभागाला देण्यात येतात. पश्चिम महाराष्टÑातही शनि शिंगणापूर, शिर्डीच्या नावावर अनेक योजना अक्षरश: पळवून नेल्या जातात. मराठवाड्याच्या वाट्याला काहीच येत नाही. वास्तविक पाहता पर्यटनाचा केंद्रबिंदू औरंगाबाद शहर आहे.संख्या कमी झालेली नाही पर्यटकांची संख्या कमी होण्यास कोणतेही एक कारण असू शकत नाही. औरंगाबादेत जर पर्यटकांची संख्या कमी झाली असेल तर त्याला अनेक कारणे असू शकतात; पण माझ्या माहितीप्रमाणे संख्या कमी झालेली नाही. नैसर्गिक ग्रोथ रेट कमी जास्त होऊ शकतो. झपाट्याने संख्या कमी होणार नाही. मी सध्या रजेवर असल्याने आकडेवारीवर जास्त बोलू शकणार नाही. डॉ.जगदीश पाटील, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसीभारतात संख्या वाढली भारतात विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. औरंगाबादेत विदेशी आणि देशी पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, हे खरे आहे. कारण पर्यटन उद्योगाची आपल्याच मंडळींनी वाट लावली आहे. शहरात चांगल्या दर्जेदार मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांचे लोंढे दाखल होतील; पण आपण पर्यटकांना देतो तरी काय...? महापालिकेची भूमिका यामध्ये सर्वात मोठी आहे. मनपा आपले योगदान किती टक्के देते तर काहीच नाही. शहरातील रस्त्यांची अवस्था न बघण्यासारखी आहे. डी. एम. यादव, निवृत्त एमटीडीसी अधिकारी