शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तूर थप्पीलाच

By admin | Updated: April 29, 2017 23:22 IST

बीड आतापर्यंत २ लाख ५९ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. मात्र, आणखी दीड लाख क्विंटल तूर थप्पीलाच आहे.

राजेश खराडे बीडचार वर्षाच्या दुष्काळानंतर सरासरीएवढा पाऊस झाल्याने यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु हमी केंद्र उघडल्यानंतरही तूर विकताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. आतापर्यंत २ लाख ५९ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. मात्र, आणखी दीड लाख क्विंटल तूर थप्पीलाच आहे. जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर २२ मार्चपासून मापाविना एक लाख क्विंटल तूर पडून आहे, तर शेतकऱ्यांकडे ५० हजार क्विंटलचा साठा शिल्लक आहे. केंद्रावरील तूर खरेदी केली जाणार असल्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र रखडलेलीच आहे.जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर खरीपात तुरीची लागवड झाली होती. खरीप अंतिम टप्प्यात असतानाच अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी तुरीला मात्र याचा लाभ झाला. प्रतिकूल परिस्थितीत तुरीचे हेक्टरी साडेसात क्विंटलप्रमाणे उत्पादन झाले होते. हमीभावाच्या अनुषंगाने डिसेंबर अखेरीस १० कृउबा ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. बारदाण्याचा अनियमित पाणीपुरवठा व शासकीय गोदामातील अपुरी जागा यामुळे पाच ते सहा वेळा खरेदी केंदे्र बंद ठेवावी लागली होती. खरेदी केंद्राच्या सुरूवातीच्या काळात अधिकारी - कर्मचाऱ्यांशी संगनमत करून अधिकतर तूर व्यापाऱ्यांनी दाखल केल्याने शेतकरी वाऱ्यावर राहिले होते. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होतानाच १५ मार्च रोजी खरेदी केंद्रे बंद करण्याचे आदेश नाफेडच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडील शिलकीची तूर पाहता ही मुदत महिनाभराने वाढविण्यात आली होती. असे असताना देखील सध्या एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील १० खरेदी केंद्रावर मापाविना पडून आहे, तर जवळपास ५० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांकडेच असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आठवडभरापासून दाखल झालेल्या तुरीची मापे देखील घेणे बंद झाले आहे. नाफेडकडून पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने मापे होत नसल्याचे खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.