शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो कवडीमोल; काढणीचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 23:47 IST

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते.

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते. भरघोस उत्पादन निघण्याची शाश्वती झाल्याने दर्जेदार उत्पादनावर अधिक खर्च करण्याची शेती व्यवसायातील परंपरा. यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले आले. पण बाजारात मागणीच नसल्याने काढणीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. लातूर जिल्ह्यातून परराज्यात दररोज १०० टन टोमॅटो जात असून, स्थानिक बाजारात १० ते १५ टन किरकोळ विक्री होत आहे. शेतकऱ्यांना ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने बांधावरच निराशा होत आहे.लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ जानवळ, वडवळ नागनाथ, नळेगाव, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव, भादा, भेटा आदी ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते. वडवळ जानवळ व औराद शहाजानी येथे अनेक शेतकरी वर्षानुवर्षे टोमॅटोचे उत्पादन घेतात. यावर्षी चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना हमी असताना दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. परिणामी, मुंबई, दिल्ली, कोलकाता व स्थानिक व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला मागणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकलेले टोमॅटो बांधावरून बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्चही विक्रीतून मिळत नाही. बाजारात पोहोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अंगलट येत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. दिल्ली व मुंबईच्या बाजारात दररोज जवळपास १०० टन टोमॅटो जात आहे. तर लातूरच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दहा ते पंधरा टन टोमॅटो येत आहे. कमी क्षेत्र असलेले काही शेतकरी व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा स्वत: किरकोळ विक्री करीत असून, दहा रुपयात तीन ते चार किलो टोमॅटोची विक्री होत आहे.