शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

टोमॅटो कवडीमोल; काढणीचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 23:47 IST

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते.

ल्ाातूर : रात्रीचा दिवस करून राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना पीक बहरात आले की, आकाश ठेंगणे होऊन जाते. भरघोस उत्पादन निघण्याची शाश्वती झाल्याने दर्जेदार उत्पादनावर अधिक खर्च करण्याची शेती व्यवसायातील परंपरा. यावर्षी टोमॅटोचे पीक चांगले आले. पण बाजारात मागणीच नसल्याने काढणीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. लातूर जिल्ह्यातून परराज्यात दररोज १०० टन टोमॅटो जात असून, स्थानिक बाजारात १० ते १५ टन किरकोळ विक्री होत आहे. शेतकऱ्यांना ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने बांधावरच निराशा होत आहे.लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ जानवळ, वडवळ नागनाथ, नळेगाव, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव, भादा, भेटा आदी ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते. वडवळ जानवळ व औराद शहाजानी येथे अनेक शेतकरी वर्षानुवर्षे टोमॅटोचे उत्पादन घेतात. यावर्षी चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना हमी असताना दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. परिणामी, मुंबई, दिल्ली, कोलकाता व स्थानिक व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला मागणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकलेले टोमॅटो बांधावरून बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्चही विक्रीतून मिळत नाही. बाजारात पोहोचविण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अंगलट येत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. दिल्ली व मुंबईच्या बाजारात दररोज जवळपास १०० टन टोमॅटो जात आहे. तर लातूरच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये दहा ते पंधरा टन टोमॅटो येत आहे. कमी क्षेत्र असलेले काही शेतकरी व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा स्वत: किरकोळ विक्री करीत असून, दहा रुपयात तीन ते चार किलो टोमॅटोची विक्री होत आहे.