शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

विहिरीत पडलेला कोल्हा तीन दिवसानंतर बाहेर

By admin | Updated: April 7, 2015 01:21 IST

तामलवाडी : पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा सुरतगाव (ता़तुळजापूर) शिवारातील विहिरीत पडल्याने तीन दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत होता़

तामलवाडी : पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा सुरतगाव (ता़तुळजापूर) शिवारातील विहिरीत पडल्याने तीन दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत होता़ वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सोमवारी वनरक्षकांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून त्याला बाहेर काढले़मिळालेल्या माहितीनुसार, सुरतगाव शिवारात विश्वनाथ नामदेव गुंड यांची शेती आहे़ गुंड यांच्या शेतातील ७० फूट खोल विहिरीत पाण्यासाठी भटकंती करणारा कोल्हा पडला होता़ ही बाब सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली़ हा कोल्हा शनिवारी या विहिरीत पडल्याचा कायास शेतकऱ्यांनी व्यक्त केला़ या घटनेची माहिती सूरतगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णा गुंड, माजी सरपंच राम गुंड, उपसरपंच तानाजी गुंड यांना दिली़ त्यांनी तत्काळ विहिरीवर जावून पाहिले असता एक वन्यप्राणी विहिरीत अडकून पडल्याचे दिसून आले़ आतमध्ये पडलेला प्राणी लांडगा आहे की कोल्हा याचा अंदाज येत नव्हता़ उपस्थितांनी तत्काळ याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी़एचक़ोळगे यांना दिली़ कोळगे यांनी वनरक्षक, मजूर यांना माहिती देवून घटनास्थळाकडे पाठवून दिले़ वन मजूर कुमार गोरे, घोरपडे, गुणवंत शित्रे, वसंत जमदाडे, नारायण पवार, देविदास महाडीक, गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यावेळी देविदास महाडीक, कुमार गोरे हे पायऱ्या नसलेल्या ७० फूट खोल विहिरीत दोरीच्या सहाय्याने उतरले़ जवळपास दीड तासाच्या प्रयत्नानंतर आतील कोल्ह्याला पोत्यामध्ये घालून दोरीच्या सहाय्याने शेंदून वर काढण्यात आले़ कोल्ह्यास वर काढल्यानंतर कोल्ह्याची तपासणी करण्यात आली़ त्यावेळी त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे दिसून आले़ वन विभागाने तीन दिवस विहिरीत अन्न-पाण्यावाचून पडलेल्या कोल्ह्याचे शर्तीचे प्रयत्न करून प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे़ (वार्ताहर)