शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

आजपासून किलबिलाट

By admin | Updated: June 14, 2016 23:58 IST

औरंगाबाद : जवळपास दीड महिना ओसाड वाटणारा शाळांचा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटामुळे उद्यापासून फुलून निघेल.

औरंगाबाद : जवळपास दीड महिना ओसाड वाटणारा शाळांचा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटामुळे उद्यापासून फुलून निघेल. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यांनंतर उद्या बुधवारपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. रविवारपासूनच जिल्हा परिषदेचे गुरुजी शाळांची साफसफाई करण्यापासून ते नवागतांच्या स्वागताच्या पूर्वतयारीमध्ये व्यस्त आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय परिसर प्रसन्न वाटावा म्हणून अनेक शाळांमधून सजावट करण्यात आली आहे. यंदा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के प्रगत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांनी स्वत: खुलताबाद तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या ताजनापूर येथील जि.प. शाळा दत्तक घेतली असून उद्या ते या गावात सकाळपासून दुपारपर्यंत थांबणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ७२४ अधिकारी विविध शाळांमध्ये नवागतांचे स्वागत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. ‘सीईओ’पासून केंद्रप्रमुखापर्यंत सर्वजण शाळेच्या पहिल्या दिवशी नेमून दिलेल्या शाळांवर सकाळीच जातील. शाळेत परिपाठ घेणे, पाठ घेणे, शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेणे, शाळा विकास आराखडा तयार करणे, फूल देऊन नवागतांचे स्वागत करणे, शक्य असेल तेथे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढणे, शालेय पोषण आहारामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देणे आदी कामांत सहभाग घेतील. या अधिकाऱ्यांना पालक अधिकारी संबोधले जाणार असून ते प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दत्तक शाळांवर जातील. हे पालक अधिकारी गणवेश वाटप, पुस्तके वाटप कार्यक्रमातही सहभाग घेतील. पालक अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षणाधिकारी आर. एस. मोगल म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांच्या आदेशानुसार जि.प., पं.स. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे जि.प. शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. दत्तक घेतलेल्या शाळांवर उद्या सकाळीच हजर होण्यासाठी सर्व पालक अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. जवळपास साडेसहा कोटी रुपयांची पाठ्यपुस्तके शाळास्तरावर पोहोच झाली आहेत. याशिवाय ६ कोटी १८ लाख रुपये गणवेशासाठी शाळांना वितरित करण्यात आलेले आहेत. आपण स्वत: वाळूजलगतच्या शाळेत हजर राहणार आहे.बुधवारपासून शाळा सुरू होत असल्याने गेल्या आठवड्यात पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय साहित्याच्या खरेदीसाठी धांदल उडाली होती. जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये तसेच काही अनुदानित शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मोफत दिली जात असली तरी व्यवसायमाला, वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग, वॉटर बॅग, रंगपेटी, कंपास, अभ्यासक्रमाची पुस्तके आदी साहित्याच्या खरेदीवर विशेष भर दिसत होता.