शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
4
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
5
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
6
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
7
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
8
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
9
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
10
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
13
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
14
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
15
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
16
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
17
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
18
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
19
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
20
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:05 IST

जायकवाडी धरणातून २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.

ठळक मुद्देधरण ९७ टक्क्यांवर

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून  २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.गुरुवारी जलसाठ्याने ९७ ही टक्केवारी ओलांडली होती. गुरुवारी सायंकाळी धरणाची  पाणीपातळी १५२१ फूट झाली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त एक फूट राहिले आहे. धरणात एकूण जलसाठा २७८९.६३० दलघमी, तर उपयुक्त जलसाठा २०५१.५१४ दलघमी झाला आहे. धरणात ७९४३० क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने सकाळपर्यंत धरण काठोकाठ भरणार आहे. आवक लक्षात घेता शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय जायकवाडीचे अधीक्षक अभियंता तांदळे व मुख्य अभियंता स्वामी यांनी घेतला, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.जायकवाडी धरणाच्या मुक्तपाणलोट क्षेत्रात येणाºया अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यातच औरंगाबाद येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात गुरुवारी सायंकाळी ७९४३० क्युसेक एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमुहातील विसर्ग गुरुवारी घटविण्यात आले आहे. भंडारदरा धरणातून फक्त ८०१ क्युसेक, दारणा धरणातून ११०० क्युसेक, गंगापूर (नाशिक) धरणातून ११०६ क्युसेक विसर्ग ठेवण्यात आले आहेत, नांदूर मधमेश्वर बंधाºयातून ३१५५ क्युसेक गोदावरीत व ओझरवेअर बंधाºयातून ५०४५ क्युसेक पाणी प्रवरेत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक घटणार असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाºया औरंगाबाद, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, राहुरी, अमरापूर, लोणी, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू असल्याने हे पाणी गतीने जायकवाडी धरणात जमा होत आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी गतीने वाढत आहे.जायकवाडीलगतच्या तालुक्यात अतिवृष्टीजायकवाडी धरणाच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, आदी तालुक्यात बुधवारी तुफान अतिवृष्टी झाली. श्रीरामपूर १६३ मि. मी., लोणी ११४ मि.मी., राहुरी १४१ मि.मी., अमरापूर ६५ मि.मी., नेवासा २४ मि. मी., कोपरगाव ४८ मि. मी., नागमठान ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली.