जालना : स्वच्छ भारत अभियानच्या वतीने शहरात एका हॉटेलमध्ये साधन व्यक्तींसाठी १० मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे केंद्रीय उपसचिव डॉ. निपूण विनायक यांनी या तयारीची शनिवारी रात्री पाहणी केली. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगाव स्वच्छता अभियान व्यापक प्रकारे राबविण्यात येणार असून त्याविषयीची माहिती प्रत्येक गावात पोहोचवून या कामास गती द्यावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, उपसचिव डॉ. निपूण विनायक, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २४० साधन व्यक्तींचा सहभाग राहील, असे स्वच्छ भारत अभियानचे जिल्हा संपर्क अधिकारी भगवान तायडे यांनी सांगितले.
शहरात आज २४० साधन व्यक्तींची कार्यशाळा
By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST