शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शिक्षक बदल्यांसाठी पुन्हा प्रतीक्षेचीच वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.शिक्षकांना संवर्ग १ ते ४ मध्ये विभागून त्या-त्या निकषानुसार आॅनलाईन बदल्या करण्याचा शासन निर्णय धडकल्यानंतर त्याला बराच विरोध झाला. मात्र तरीही शासनाने ही प्रकिया रेटून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेला कितीही विरोध झाला, न्यायालयात प्रकरण गेले तरीही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यासाठी दिवाळीपर्यंतचा काळही पुरला नाही. दिवाळीच्या सुट्यांतही संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे यात इच्छा नसतानाही अनेकांचे सक्तीने अर्ज भरून घेण्यात आले. सर्व्हरवर अतिरिक्त ताण असल्याने दिवाळीच्या सुट्या शिक्षकांनी याच एका कामात खर्ची घातल्या. त्यानंतरही दोनदा मुदतवाढ द्यावी लागली. यानंतर या बदल्या होण अपरिहार्य दिसत असल्याने विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत मोर्चे काढून आपला विरोध दर्शविला. यात नव्या शिक्षकांपेक्षा जुन्या शिक्षकांचाच विरोध मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच समायोजन झालेल्यांनाही बदलीचा झटका बसू शकतो, हे दिसू लागल्याने तीव्र विरोध होता. मात्र अजून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या लॉग इनचे काम बाकी असल्याने या बदल्या झाल्या नसल्याचे सांगितले जाते. जर या बदल्या झाल्याच तर आपल्यालाही ‘खो’ बसतो काय? नवीन ठिकाणी कधी रुजू व्हावे लागेल, याची चिंता शिक्षकांना दिसत आहे.