शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत. चौकाचौकात लोकांकडे जाऊन त्यांची करमणूक करून अर्थार्जनही करीत आहेत. बहुरूपींचा पिढ्या न पिढ्याचा हा व्यवसाय असला तरी आता समाजातून त्यांना म्हणावे तसे अर्थार्जन होत नसल्याने अशा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.बहुरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख आहे. बहुरूपी मनोरंजनासह कधी-कधी खबऱ्या म्हणूनही काम करतात. विशिष्ट कला असलेल्या बहुरूपींना समाजात मान असतो. बहुरूपी समाजाचेही कोणत्या गावात कोणी जावे हे ठरलेले असते, असे कोळगाव येथे आलेले बहुरूपी सुभाष शिंदे यांनी सांगितले. सुभाष शिंदे हे वयाच्या दहाव्या वर्षीपासून बहुरूपी म्हणून गावोगाव जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या. ठराविक नागरिकांची सासरवाडी कोठे आहे, काहींच्या बहिनी कोठे दिलेल्या आहेत आदींबाबत माहितीही बहुरूपी ठेवत असल्याचे शिंदे म्हणाले.गावातील सरपंच, पोलीस पाटील यासह प्रमुख विक्रेते, गावातील ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचीच माहिती ठेवावी लागत असल्याचे घोडेगाव तालुका नेवासा येथील बहुरूपी बाबाजी शेंगर यांनी सांगितले.ते म्हणाले की, आम्हाला असंख्य दु:ख असली तरी आम्ही ज्यांच्याकडे जातो त्यांना आम्हाला हसवावेच लागते. नकला, विशिष्ट लयीत बोलून, कोट्या करून लोकांचे मनोरंजन करावे लागते. यातून अर्थार्जनही होते. अनेकदा उन, वारा, पाऊस यांची तमा न करता बहुरूपी गावालगत वास्तव्यास असतात. अशावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र काही ठिकाणी आजही सन्मानाची वागणूक मिळते तसेच चहा, नाष्टा, जेवण आदींची विचारपूस मोठ्या आस्थेने करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. बहुरूपी पोलिसांसारखे वेश करीत असल्याने अनेकदा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणतात तर लहान मुलांची करमणूक होत असल्याचे बाबाजी शेंगर यांनी सांगितले. (वार्ताहर)या समाजासमोर शिक्षण, आरोग्य हे महत्वाचे प्रश्न असल्याचे सुभाष शिंदे यांनी सांगितले. पोट भरण्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनांची माहितीही मिळत नसल्याचे शिंदे म्हणाले. त्यातच गेल्या काही दिवसांत बहुरूपींना दान देण्याचे प्रमाणही कमी झाल्याने या समाजाच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.