शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात सध्या पोलीसांचा वेश धारण करून बहुरूपी घरोघरी फिरत आहेत. चौकाचौकात लोकांकडे जाऊन त्यांची करमणूक करून अर्थार्जनही करीत आहेत. बहुरूपींचा पिढ्या न पिढ्याचा हा व्यवसाय असला तरी आता समाजातून त्यांना म्हणावे तसे अर्थार्जन होत नसल्याने अशा समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.बहुरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख आहे. बहुरूपी मनोरंजनासह कधी-कधी खबऱ्या म्हणूनही काम करतात. विशिष्ट कला असलेल्या बहुरूपींना समाजात मान असतो. बहुरूपी समाजाचेही कोणत्या गावात कोणी जावे हे ठरलेले असते, असे कोळगाव येथे आलेले बहुरूपी सुभाष शिंदे यांनी सांगितले. सुभाष शिंदे हे वयाच्या दहाव्या वर्षीपासून बहुरूपी म्हणून गावोगाव जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या. ठराविक नागरिकांची सासरवाडी कोठे आहे, काहींच्या बहिनी कोठे दिलेल्या आहेत आदींबाबत माहितीही बहुरूपी ठेवत असल्याचे शिंदे म्हणाले.गावातील सरपंच, पोलीस पाटील यासह प्रमुख विक्रेते, गावातील ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचीच माहिती ठेवावी लागत असल्याचे घोडेगाव तालुका नेवासा येथील बहुरूपी बाबाजी शेंगर यांनी सांगितले.ते म्हणाले की, आम्हाला असंख्य दु:ख असली तरी आम्ही ज्यांच्याकडे जातो त्यांना आम्हाला हसवावेच लागते. नकला, विशिष्ट लयीत बोलून, कोट्या करून लोकांचे मनोरंजन करावे लागते. यातून अर्थार्जनही होते. अनेकदा उन, वारा, पाऊस यांची तमा न करता बहुरूपी गावालगत वास्तव्यास असतात. अशावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र काही ठिकाणी आजही सन्मानाची वागणूक मिळते तसेच चहा, नाष्टा, जेवण आदींची विचारपूस मोठ्या आस्थेने करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. बहुरूपी पोलिसांसारखे वेश करीत असल्याने अनेकदा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणतात तर लहान मुलांची करमणूक होत असल्याचे बाबाजी शेंगर यांनी सांगितले. (वार्ताहर)या समाजासमोर शिक्षण, आरोग्य हे महत्वाचे प्रश्न असल्याचे सुभाष शिंदे यांनी सांगितले. पोट भरण्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनांची माहितीही मिळत नसल्याचे शिंदे म्हणाले. त्यातच गेल्या काही दिवसांत बहुरूपींना दान देण्याचे प्रमाणही कमी झाल्याने या समाजाच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.