शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:09 IST

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजल उत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणी बचतीची प्रतिज्ञा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले. लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जल उत्सव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.लोकमत हॉल, लोकमत भवन येथे मंगळवारी सायंकाळी सखी मंचच्या सदस्यांसाठी, तसेच वाचक महिलासांठी जल उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच वर्षा जाधव, कलाकार संदीप पाटील आणि सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना जाधव यांनी पालखेड गावात जलसंवर्धनासंदर्भात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, २०१५ साली गावात ट्रँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा तरीही पाणी पुरायचे नाही.पाण्याचे हे भीषण संकट पाहून त्यांनी जलयुक्त शिवार-माथा ते पायथा, शोषखड्डे, वॉटर कप, विहीर आणि आड गाळमुक्त करणे, असे अनेक उपक्रम राबविले आणि या सर्व योजनांचा परिपाक म्हणजे सध्या गावातील नाले, आड, विहिरी भरलेल्या असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही टँकर मागवावे लागलेनाही.जाधव यांनी गावात धोबीघाट बांधले असून, याच ठिकाणी महिला क पडे धुण्यासाठी येतात. या धोबीघाटाचे पाणी शोष खड्ड्यात जमा केले जाते. यासोबतच गावात ठिकठिकाणी शोषखड्डे बांधले असून, गावकऱ्यांनी आपापल्या घरी रेन वॉटर हावेस्ंिटग करून घ्यावे, याबाबतही त्या आग्रही आहेत.या कार्यक्रमात महिलांना रिनच्या मदतीने पाणी बचत करणे कसे शक्य आहे, यासंबंधी माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीतही दाखविण्यात आली. कार्यक्र माच्या अखेरीस प्रत्येक सखीने जलसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.घोषवाक्य, पोस्टर स्पर्धेतील विजेतेजल उत्सवानिमित्त सखींसाठी ‘पाणी बचत’ या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घोषवाक्य स्पर्धेत अलका निघोटे, शारदा जाधव, उषा ताडलिंभेकर यांनी बाजी मारली तर अंजली निंबेकर, पल्लवी शेटे, कल्पना काळवणे, नीलिमा आचार्य या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.

पुढील पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागेलपाण्याचे महत्त्व सांगताना वर्षा जाधव म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण पुढील पिढीसाठी संपत्ती जमा करून ठेवतो, त्याचप्रमाणे आता पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून ते पुढील पिढीसाठी जतन करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात महिलांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यांना पाणी बचतीविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.म्युझिकल गेम शोची धमालजल उत्सव कार्यक्रमात पुणे येथील कलाकार संदीप पाटील यांनी म्युझिकल गेम शो सादर केला. यात सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भरपूर बक्षिसे जिंकली.

टॅग्स :Lokmat Sakhi manch aurangabadलोकमत सखी मंच औरंगाबादWaterपाणीLokmat Eventलोकमत इव्हेंट