शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:09 IST

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजल उत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणी बचतीची प्रतिज्ञा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले. लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जल उत्सव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.लोकमत हॉल, लोकमत भवन येथे मंगळवारी सायंकाळी सखी मंचच्या सदस्यांसाठी, तसेच वाचक महिलासांठी जल उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच वर्षा जाधव, कलाकार संदीप पाटील आणि सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना जाधव यांनी पालखेड गावात जलसंवर्धनासंदर्भात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, २०१५ साली गावात ट्रँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा तरीही पाणी पुरायचे नाही.पाण्याचे हे भीषण संकट पाहून त्यांनी जलयुक्त शिवार-माथा ते पायथा, शोषखड्डे, वॉटर कप, विहीर आणि आड गाळमुक्त करणे, असे अनेक उपक्रम राबविले आणि या सर्व योजनांचा परिपाक म्हणजे सध्या गावातील नाले, आड, विहिरी भरलेल्या असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही टँकर मागवावे लागलेनाही.जाधव यांनी गावात धोबीघाट बांधले असून, याच ठिकाणी महिला क पडे धुण्यासाठी येतात. या धोबीघाटाचे पाणी शोष खड्ड्यात जमा केले जाते. यासोबतच गावात ठिकठिकाणी शोषखड्डे बांधले असून, गावकऱ्यांनी आपापल्या घरी रेन वॉटर हावेस्ंिटग करून घ्यावे, याबाबतही त्या आग्रही आहेत.या कार्यक्रमात महिलांना रिनच्या मदतीने पाणी बचत करणे कसे शक्य आहे, यासंबंधी माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीतही दाखविण्यात आली. कार्यक्र माच्या अखेरीस प्रत्येक सखीने जलसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.घोषवाक्य, पोस्टर स्पर्धेतील विजेतेजल उत्सवानिमित्त सखींसाठी ‘पाणी बचत’ या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घोषवाक्य स्पर्धेत अलका निघोटे, शारदा जाधव, उषा ताडलिंभेकर यांनी बाजी मारली तर अंजली निंबेकर, पल्लवी शेटे, कल्पना काळवणे, नीलिमा आचार्य या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.

पुढील पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागेलपाण्याचे महत्त्व सांगताना वर्षा जाधव म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण पुढील पिढीसाठी संपत्ती जमा करून ठेवतो, त्याचप्रमाणे आता पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून ते पुढील पिढीसाठी जतन करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात महिलांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यांना पाणी बचतीविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.म्युझिकल गेम शोची धमालजल उत्सव कार्यक्रमात पुणे येथील कलाकार संदीप पाटील यांनी म्युझिकल गेम शो सादर केला. यात सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भरपूर बक्षिसे जिंकली.

टॅग्स :Lokmat Sakhi manch aurangabadलोकमत सखी मंच औरंगाबादWaterपाणीLokmat Eventलोकमत इव्हेंट