शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:09 IST

जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजल उत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणी बचतीची प्रतिज्ञा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले. लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जल उत्सव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.लोकमत हॉल, लोकमत भवन येथे मंगळवारी सायंकाळी सखी मंचच्या सदस्यांसाठी, तसेच वाचक महिलासांठी जल उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच वर्षा जाधव, कलाकार संदीप पाटील आणि सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

याप्रसंगी बोलताना जाधव यांनी पालखेड गावात जलसंवर्धनासंदर्भात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, २०१५ साली गावात ट्रँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा तरीही पाणी पुरायचे नाही.पाण्याचे हे भीषण संकट पाहून त्यांनी जलयुक्त शिवार-माथा ते पायथा, शोषखड्डे, वॉटर कप, विहीर आणि आड गाळमुक्त करणे, असे अनेक उपक्रम राबविले आणि या सर्व योजनांचा परिपाक म्हणजे सध्या गावातील नाले, आड, विहिरी भरलेल्या असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही टँकर मागवावे लागलेनाही.जाधव यांनी गावात धोबीघाट बांधले असून, याच ठिकाणी महिला क पडे धुण्यासाठी येतात. या धोबीघाटाचे पाणी शोष खड्ड्यात जमा केले जाते. यासोबतच गावात ठिकठिकाणी शोषखड्डे बांधले असून, गावकऱ्यांनी आपापल्या घरी रेन वॉटर हावेस्ंिटग करून घ्यावे, याबाबतही त्या आग्रही आहेत.या कार्यक्रमात महिलांना रिनच्या मदतीने पाणी बचत करणे कसे शक्य आहे, यासंबंधी माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीतही दाखविण्यात आली. कार्यक्र माच्या अखेरीस प्रत्येक सखीने जलसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.घोषवाक्य, पोस्टर स्पर्धेतील विजेतेजल उत्सवानिमित्त सखींसाठी ‘पाणी बचत’ या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घोषवाक्य स्पर्धेत अलका निघोटे, शारदा जाधव, उषा ताडलिंभेकर यांनी बाजी मारली तर अंजली निंबेकर, पल्लवी शेटे, कल्पना काळवणे, नीलिमा आचार्य या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.

पुढील पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागेलपाण्याचे महत्त्व सांगताना वर्षा जाधव म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण पुढील पिढीसाठी संपत्ती जमा करून ठेवतो, त्याचप्रमाणे आता पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून ते पुढील पिढीसाठी जतन करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात महिलांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यांना पाणी बचतीविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.म्युझिकल गेम शोची धमालजल उत्सव कार्यक्रमात पुणे येथील कलाकार संदीप पाटील यांनी म्युझिकल गेम शो सादर केला. यात सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भरपूर बक्षिसे जिंकली.

टॅग्स :Lokmat Sakhi manch aurangabadलोकमत सखी मंच औरंगाबादWaterपाणीLokmat Eventलोकमत इव्हेंट