शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

पेरणीपूर्वीच पिकविम्याची मुदत संपली

By admin | Updated: July 1, 2014 00:38 IST

रामेश्वर काकडे, नांदेड खरीप हंगामातील विविध पिकांसाठी शासनाने यावर्षापासून हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली. परंतु पिकांच्या पेरणीपूर्वीच विम्याची मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी वंचीत राहिले

रामेश्वर काकडे, नांदेडखरीप हंगामातील विविध पिकांसाठी शासनाने यावर्षापासून हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली. परंतु पिकांच्या पेरणीपूर्वीच विम्याची मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी पिक विम्यापासून वंचीत राहिले आहेत.शासनाने नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांचा हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केलेला आहे. खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या चार पिकांसाठी विमा योजना लागू केली. शेतकऱ्यांना खरीप पिकांचा विमा भरण्यासाठी ३० जून २०१४ ही शेवटची मुदत दिली होती. परंतु आजघडीला जिल्ह्यात खरीपाच्या केवळ ३ ते ४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपण पेरणी केलीच नाही, तर विमा काढायचा कशाचा हा विचार करुन विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे. तर कंपनीने विमा भरण्यासाठी कमी दिवसाचा कालावधी दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेवटची तारीखच कळू शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी पिकांना संरक्षितता देण्यापासून दूर राहिले आहेत.संभाव्य पेरणीच्या आधारे विमा भरण्याची मूभा विमा कंपनीने दिली होती. पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टीपासून नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. परंतु जिल्ह्यात अद्याप पीकांची पेरणीच झाली नसल्याने पिकविम्यापाचा जवळपास ७५ ते ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी एैच्छिक स्वरुपाची आहे. प्रति हेक्टरी शेतकऱ्यांनी स्वत:च्या हिश्याचे कापसासाठी ९५० रुपये, सोयाबीन ९२३ रुपये, उडिदासाठी ७५६ तर मुगासाठी ६१२ रुपये भरावयाचे आहेत.बँकांनी शेतकऱ्यांना पेरणी प्रमाणपत्रासाठी आडवणूक करु नये, असे अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीने सर्व बँकांना पत्र पाठवून सूचित केले होते. शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा जोडून विमा हप्ता भरावयाचा होता.सेतू सुविधा केंद्र झाले हँग-पिकविमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी जिल्ह्यातील बहुतांश सुविधा केंद्र हँग झाले होते, यामुळे सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना तास्नतास सेतू केंद्रावर ताटकळत बसावे लागले. याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांना सातबाराच मिळू शकल्या नाहीत, नवीन वर्षातीलच सातबारा सोबत जोडावा असा, अलिखित नियम बँकांनी काढल्याने याचा परिणाम हजारो शेतकऱ्यांना पिकविमा काढता आलेला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणच्या सेतू केंद्रावर सातबारा काढण्यासाठी गर्दी झाली होती, यामुळे सर्वच ठिकाणी सर्व्हरवर लोड आल्यामुळे सेतुची सुविधाही ठप्प झाली होती. यामुळे शासनाने पिकविमा काढण्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़(प्रतिनिधी) आजपर्यंत जिल्ह्यात पेरण्यांलाच सुरुवात झाली नसल्याने शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले आहेत. रामराव कदम, जिल्हाध्यक्ष, कृषी व ग्रामीण विकास विभाग, काँग्रेस.विम्यासाठी कमी कालावधी होता़ यामुळे शासनाने तारीख वाढवून दिल्यास सर्व शेतकऱ्यांना विमा काढता येईल. प्रल्हाद इंगोले, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना