शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलासाठी संसारावर तुळशीपत्र

By admin | Updated: May 14, 2017 00:34 IST

लातूर : अवघ्या वर्षभरानंतर पतीनेही मुलावर उपचार करण्यास नकार देत दुसरा संसार थाटला़ अशा परिस्थितीत कुठलीही हार न मानता संसारावर तुळशीपत्र ठेवून ती माता दिव्यांग मुलावर नऊ वर्षांपासून उपचार करीत आहे़.

लातूर : सुखी संसाराची वेल बहरत असताना दोन मुले झाली़ त्यामुळे पती-पत्नीच्या आनंदाला पारवार उरला नाही़ परंतु, त्यातील पहिला मुलगा हा दिव्यांग़ ही बाब नवऱ्यासह सासरच्या मंडळींना बोचत होती़ असा मुलगा राहून तरी काय करणार? अशा मानसिकतेत सासरची मंडळी असताना तिने मात्र या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी पतीला राजी करुन लातूर गाठले़ परंतु, अवघ्या वर्षभरानंतर पतीनेही मुलावर उपचार करण्यास नकार देत दुसरा संसार थाटला़ अशा परिस्थितीत कुठलीही हार न मानता संसारावर तुळशीपत्र ठेवून ती माता दिव्यांग मुलावर गेल्या नऊ वर्षांपासून सतत उपचार करीत आहे़.. ही व्यथा आहे, कानेगावच्या सावित्री मोटाडे यांची़‘माझ्या माईच्या पुढं थिटं, सारं देऊळ राऊऴ़़तिच्या फाटलेल्या टाचा मंदी, माझं अजिंठा-वेरुळ’या उक्तीप्रमाणे जीवन व्यतित करणाऱ्या गोपाळची अवस्था यापेक्षा वेगळी नाहीच. जन्मताच दिव्यांग असलेल्या गोपाळला आईशिवाय कुठली हालचाल करता येत नाही. वय वर्ष १८ असले तरी दोन वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचे जगणे सुरू आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी रघुनाथ तोटे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले़ रघुनाथरावांची दुसरी मुलगी सावित्री हिचा विवाह कानेगाव (ता.शिरुर अनंतपाळ) येथील सुनील मोटाडे यांच्याशी सन १९९६ मध्ये झाला़ सावित्रीच्या संसाराची वेल बहरत होती़ निसर्ग नियमाप्रमाणे नैसर्गिक बाळंत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले़ उभयतांचा आनंद गगनात मावेना झाला. परंतु, हा मुलगा दिव्यांग असल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. आनंदावर विरजण पडले़ सासरच्या मंडळींच्या मनात खंत निर्माण झाली़ ही खंत दूर व्हावी म्हणून माहेरच्या मंडळींनी गोपाळवर उपचार केल्यानंतर तो बरा होईल, असे सांगून मन परिवर्तन केले़ त्यासाठी तोटे कुटुंबियांनी सुरुवातीस गोपाळच्या उपचाराचा खर्चही उचलला़ गोपाळवर उपचार चालूच होते. दरम्यान, सन १९९९ मध्ये सावित्रीला दुसरा मुलगा झाला़ अजय त्याचे नाव. एकीकडे अजयमुळे आनंद तर दुसरीकडे गोपाळचे कसे होईल, याची चिंता सावित्रीला सतावत होती. गोपाळवर चांगल्या ठिकाणी उपचार केले पाहिजे, यासाठी तिने पतीला राजी केले़ लातुरातील संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु झाले़ वर्ष-दीड वर्षाचा कालावधी उलटताच पती सुनीलला मुलावर उपचार करणे निरर्थक वाटू लागले़ त्यामुळे सावित्री आणखी चिंताग्रस्त झाल्या़ मुलगा दिव्यांग असला तरी त्याचा आपणच सांभाळ केला पाहिजे, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली़ पण पत्नी ऐकत नसल्याचे पाहून सुनीलने बायको-लेकराला वाऱ्यावर सोडले. २०१३ मध्ये त्याने दुसरा विवाह केला़ आधार तुटलेल्या सावित्री कोलमडल्या, पण हार मानली नाही़ दोन मुले हेच आपले सर्वस्व मानून जिद्दीने परिस्थितीशी सामना केला. दरम्यान, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रात त्यांना केंद्रातच काळजीवाहक म्हणून नियुक्त केले़ तेथील वेतन तुटपुंजे असल्याने बहीण सुमित्रा तोटे व भावाने मदतीचा हात दिला़ अजय पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे तर गोपाळ परिस्थितीशी झगडतो आहे...