शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

नियम आणखी कडक करा, पण पुन्हा लाॅकडाऊन नकोच

By | Updated: November 29, 2020 04:06 IST

योगेश पायघन औरंगाबाद : दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व उपचारासाठी भरती रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादसाठी पुढील तीन ...

योगेश पायघन

औरंगाबाद : दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व उपचारासाठी भरती रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादसाठी पुढील तीन महिने धोक्याचे असल्याचा इशारा मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आला. त्यावर व्यापारी, कामगार, डाॅक्टरांच्या संघटनेकडून नियम आणखी कडक करा; पण पुन्हा लाॅकडाऊन नको, असा सूर निघत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ हजार पार गेला आहे. गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या हजाराकडे मार्गक्रमण करीत आहे, तर दुसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाकडून रस्ते, विमान, रेल्वे मार्गावर तपासणीला सुरुवात झाली आहे. मनपानेही विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी वाढवली. आरोग्य विभाग आणि राज्य, केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून घ्या. दंडात्मक कारवाई वाढवा; पण हे करीत असताना पुन्हा लाॅकडाऊनचा निर्णय नकोच, असे मत डॉक्टर, व्यापारी व कर्मचारी संघटनांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

---

लाॅकडाऊन हा काही कोरोनावर इलाज नाही. अगोदरच व्यापाऱ्यांचा व्यापार आठ महिन्यांपासून ठप्प आहे. नागरिकांत जनजागृती मुंबई, पुण्याप्रमाणे करण्यासाठी व विना मास्क फिरणाऱ्यांवर मनपा आणि पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. व्यापारी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्कबद्दल ग्राहकांना सांगतील, व्यवसायात शासनाच्या सूचनांचे पालनही करतील. नियमांची अंमलबजावणी कडक व्हावी. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन नकोच.

-जगन्नाथ काळे, व्यापारी महासंघ

--

लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी अधिक जनजागृती करा. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढविण्याची गरज आहे. खूपच गरज भासल्यास सायंकाळी लवकर मार्केट बंद करावे. मात्र, लाॅकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत सर्वच स्तरातील लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली. आता पुन्हा तसे व्हायला नको.

-अजय शहा, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष, काॅन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.

---

लाॅकडाऊन करणार नाही. मात्र, नियम अतिशय कडक राबविले जातील. केंद्र शासनाने सूचित केलेल्या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी जिल्ह्याच्या सीमांवर होणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल. नागरिकांनी शासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनी त्याचे पालन करावे.

-सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

--

लाॅकडाऊनमुळे लोकांत अस्वस्थता निर्माण होते. त्याचे सर्वच घटकांना परिणाम भाेगावे लागतात. कोरोनाची दुसरी लाट जगभरात थैमान घालत आहे. आता कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची हीच वेळ आहे.

-डाॅ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद

--

दुसरी लाट रोखली पाहिजे. त्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन प्रत्येक कारखान्यात, प्रत्येक कामगार करील. पहिल्या लाॅकडाऊनच्या आर्थिक संकटातून अद्याप कामगार सावरला नाही. ९० टक्के कामगारांना पगार नव्हे ॲडव्हान्स मिळाला. बोनस नाही. त्यात नोकर कपातीच्या संकटात पुन्हा लाॅकडाऊनचा पर्याय कोणत्याच कामगाराला परवडणारा नाही.

-प्रभाकर मते, मराठवाडा विभागीय सचिव, भारतीय कामगार सेना

--

पॉइंटर्स

--

कोरोनाचे एकूण रुग्ण - ४३,०६४

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ४१,०२०

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ९०१

कोरोनाचे बळी - १,१४३