शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अतिपावसामुळे तूर पिकाचे नुकसान !

By admin | Updated: January 28, 2017 00:52 IST

लातूर हैदराबाद येथील संशोधन संस्थेने विकसित केलेल्या तुरीच्या आयसीटीएच २७४० वाणाचे बियाणे जिल्ह्यात साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप केले होते.

हरी मोकाशे लातूरहैदराबाद येथील संशोधन संस्थेने विकसित केलेल्या तुरीच्या आयसीटीएच २७४० वाणाचे बियाणे जिल्ह्यात साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप केले होते. मात्र या पिकास केवळ फुलेच लगडली़ शेंगाच लागल्याच नाहीत़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून हैदराबादच्या संशोधन तज्ज्ञांनी पाहणी केली असून, नुकसानीस बियाणाचा दोष नसून, अतिपावसामुळे पीक आले नसल्याचा अहवाल दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली हैदराबाद येथे इक्रीसॅट ही बियाणे संशोधन संस्था आहे़ या संस्थेने गेल्या वर्षी तुरीचे आयसीटीएच २७४० हे वाण विकसित केले़ दरम्यान, हे वाण जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी कृषी विभागाकडे देण्यात आले़ कृषीच्या अधिकाऱ्यांनी तुरीचे चांगले उत्पन्न मिळणारे नवीन वाण उपलब्ध झाल्याचे सांगून त्याचे जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले़ शासनाकडून नवीन वाण आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी ते मिळविण्यासाठी धावपळ केली होती़ त्यामुळे खरीप हंगामाच्या कालावधीत या वाणाचा दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता़ दरम्यान, काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे हे तुरीचे पीक घेतले़ डिसेंबरमध्ये पीक काढणीला आले असतानाही केवळ फुलेच लगडली़ शेंगाच लागल्या नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली़ या वाणाच्या पीकक्षेत्राची पाहणी पथकांद्वारे करण्यात आली़ या पथकात हैदराबाद येथील इक्रीसॅट संशोधन केंद्रातील तीन तज्ज्ञ संशोधक, उपविभागीय कृषी अधिकारी आऱ टी़ मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ़ डिग्रसे यांचा समावेश होता़ या तज्ज्ञांनी आपला पाहणी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे गत आठवड्यात सादर केला असून तुरीला शेंगा न लगडण्याचे कारण हे अतिपावसाचे दिले आहे.