शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ई-पॉसवर ठेवताच अंगठा; कोरोनाच्या धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांनी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांनी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने ई-पॉसवर अंगठा ठेऊन धान्य वितरण बंद करण्यासह इतर मागण्यांसाठी १ मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपावर तोडगा निघाला नाहीतर लॉकडाऊन काळात मोफत धान्य वाटपात अडचणी येण्याची शक्यता आहे.

प्रत्येक दुकानदाराच्या संपर्कात ३०० हून अधिक नागरिक येतात. त्यांचे अंगठे ई-पॉस मशीनवर लावून घेतल्यानंतर धान्य दिले जाते. प्रत्येकवेळी सॅनिटायझर वापरावे लागते. यात थोडी गडबड झाली तर दुकानदाराच्या जीवावर बेतू लागले आहे. गर्दी झाल्यानंतर ती आटोक्यात आणणे दुकानातील दोन व्यक्तींच्या आवाक्याबाहेर जाते. यासारख्या अनेक अडचणींचा सामना वर्षभरात रेशन दुकानदारांनी केल्यामुळे ई-पॉसला बंद करण्याची मूळ मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने लावून धरली आहे.

७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्याची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.

रेशन दुकाने आणि कार्डधारकांची संख्या

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१

एकूण रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४

पिवळे रेशनकार्डधारक - ६५ हजार ४८२

केशरी रेशनकार्डधारक - ४ लाख ८ हजार ४०

पांढरे रेशनकार्डधारक - ३ लाख २४ हजार ४०४

रेशन दुकानदारांचे सॅनिटायझर असते

शासनाकडून किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सॅनिटायझर पुरविले जात नाही. रेशन दुकानदारच स्वत:च्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने वर्षभरापासून सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करीत आहेत. वारंवार मागण्या करूनही प्रशासन आणि शासनाने काहीही दखल घेतली नसल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये संताप आहे.

१०७ जण दगावले राज्यभरात

अ.म.स्वस्त धान्य दुकानदार महासंघ अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील वर्षापासून आजवर १०७ रेशन दुकानदारांचे मृत्यू कोरोनाने झाले आहेत. त्यांच्याप्रती एका शब्दाने सहानुभूती शासनाकडून मिळाली नाही. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये ५ जण दगावले. त्यामुळे ई-पॉस बंद करून ते आधारशी लिंक करून धान्यवाटप करण्याची परवानगीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पुरवठा विभाग प्रशासनाने दुकानदारांना धमक्या देण्यास सुरूवात केली आहे. परंतु आमच्या मागण्या मंजुरीबाबत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.

मे आणि जून महिन्याचे धान्य देणार

जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले, मे आणि जून महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. मे साठी कोटा मंजूर झाला असून, त्याचे वाटप सुरू केले आहे. तर जूनसाठी प्रत्येकी पाच किलाे मोफत तांदूळ केंद्र शासनाकडून मंजूर होणार आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांना धान्य देण्यात येणार आहे. संपाबाबत रेशन दुकानदार संघटनेशी बोलणी सुरू आहे.