शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

ई-पॉसवर ठेवताच अंगठा; कोरोनाच्या धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांनी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांनी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने ई-पॉसवर अंगठा ठेऊन धान्य वितरण बंद करण्यासह इतर मागण्यांसाठी १ मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपावर तोडगा निघाला नाहीतर लॉकडाऊन काळात मोफत धान्य वाटपात अडचणी येण्याची शक्यता आहे.

प्रत्येक दुकानदाराच्या संपर्कात ३०० हून अधिक नागरिक येतात. त्यांचे अंगठे ई-पॉस मशीनवर लावून घेतल्यानंतर धान्य दिले जाते. प्रत्येकवेळी सॅनिटायझर वापरावे लागते. यात थोडी गडबड झाली तर दुकानदाराच्या जीवावर बेतू लागले आहे. गर्दी झाल्यानंतर ती आटोक्यात आणणे दुकानातील दोन व्यक्तींच्या आवाक्याबाहेर जाते. यासारख्या अनेक अडचणींचा सामना वर्षभरात रेशन दुकानदारांनी केल्यामुळे ई-पॉसला बंद करण्याची मूळ मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने लावून धरली आहे.

७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्याची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.

रेशन दुकाने आणि कार्डधारकांची संख्या

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१

एकूण रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४

पिवळे रेशनकार्डधारक - ६५ हजार ४८२

केशरी रेशनकार्डधारक - ४ लाख ८ हजार ४०

पांढरे रेशनकार्डधारक - ३ लाख २४ हजार ४०४

रेशन दुकानदारांचे सॅनिटायझर असते

शासनाकडून किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सॅनिटायझर पुरविले जात नाही. रेशन दुकानदारच स्वत:च्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने वर्षभरापासून सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करीत आहेत. वारंवार मागण्या करूनही प्रशासन आणि शासनाने काहीही दखल घेतली नसल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये संताप आहे.

१०७ जण दगावले राज्यभरात

अ.म.स्वस्त धान्य दुकानदार महासंघ अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील वर्षापासून आजवर १०७ रेशन दुकानदारांचे मृत्यू कोरोनाने झाले आहेत. त्यांच्याप्रती एका शब्दाने सहानुभूती शासनाकडून मिळाली नाही. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये ५ जण दगावले. त्यामुळे ई-पॉस बंद करून ते आधारशी लिंक करून धान्यवाटप करण्याची परवानगीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पुरवठा विभाग प्रशासनाने दुकानदारांना धमक्या देण्यास सुरूवात केली आहे. परंतु आमच्या मागण्या मंजुरीबाबत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.

मे आणि जून महिन्याचे धान्य देणार

जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले, मे आणि जून महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. मे साठी कोटा मंजूर झाला असून, त्याचे वाटप सुरू केले आहे. तर जूनसाठी प्रत्येकी पाच किलाे मोफत तांदूळ केंद्र शासनाकडून मंजूर होणार आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांना धान्य देण्यात येणार आहे. संपाबाबत रेशन दुकानदार संघटनेशी बोलणी सुरू आहे.