शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विद्यापीठातील तीन अधिष्ठातांना पदावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:50 IST

सत्ताधा-यांमधील नाराज गटाने स्वत:च्या मर्जीत नसलेल्या तीन अधिष्ठातांना पदावरून काढण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देया नियुक्तीमुळे सत्ताधारी असलेल्या गटातील एक गट प्रचंड नाराज झाला होता. तीन अधिष्ठातांना पद व्यपगत झाल्याचे कारण देत पदावरून काढण्यात आले

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यपगत पद असलेल्या अधिष्ठातांना पदावरून काढण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. मात्र, चारपैकी एक अधिष्ठाता पदावर कायम राहिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विद्यापीठाच्या कायद्यानुसार कुलगुरूपदाची मुदत संपल्यानंतर अधिष्ठातांचाही कालावधी व्यपगत होतो. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अतिरिक्त पदभार स्वीकारलेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यपगत झालेल्या तीन अधिष्ठातांना शैक्षणिक वर्ष संपताच १४ जून रोजी पदावरून काढले. यामध्ये डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मजहर फारुकी आणि डॉ. संजय साळुंके यांचा समावेश होता. तेव्हा आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. संजीवनी मुळे यांना पदावर कायम ठेवण्यात आले होते. पदावरून काढलेल्या जागी सामाजिकशास्त्रे अधिष्ठातापदी डॉ. सतीश दांडगे, व्यवस्थापन व वाणिज्यच्या अधिष्ठातापदी डॉ. मुरलीधर लोखंडे आणि विज्ञानशाखेच्या डॉ. बी.बी. वायकर यांची नियुक्ती केली होती.

या नियुक्तीमुळे सत्ताधारी असलेल्या गटातील एक गट प्रचंड नाराज झाला होता. मात्र, या बदलामागे दोन व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी ताकद लावली होती. पूर्णवेळ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर पूर्वी नाराज झालेल्या गटाने पुन्हा अधिष्ठाता बदलासाठी खेळी केल्याची माहिती समोर येत आहे. 

अतिरिक्त पदभार संपल्यामुळे डॉ. देवानंद शिंदे यांनी नेमलेल्या तीन अधिष्ठातांना पद व्यपगत झाल्याचे कारण देत पदावरून काढण्यात आले आहेत. याविषयी अधिष्ठाता डॉ. सतीश दांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्र मिळाल्याचे स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

एक कायम कसा?विद्यापीठ कायद्यामध्ये कुलगुरू पदाबरोबर अधिष्ठातांचे पद व्यपगत होते. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू असेल तर ते वर्ष संपेपर्यंत त्यांना कायद्यानुसार ठेवता येऊ शकते. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना झाला असल्यामुळे अधिष्ठांताना वर्षभर कायम ठेवता आले असते. मात्र, सत्ताधा-यांमधील नाराज गटाने व्यपगत पद असल्याचे कारण दाखवून स्वत:च्या मर्जीत नसलेल्या तीन अधिष्ठातांना पदावरून काढण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे. याचवेळी आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. संजीवनी मुळे यांना पत्र दिले नसल्यामुळे संशय निर्माण होत आहे. या निर्णयासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचेही समोर येत आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र