शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासात तीनदा तारीख बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:50 IST

कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अर्ध्या तासाच्या अंतरानेच तब्बल तीन वेळा बैठकीची तारीख आणि वेळ बदलल्याचे संदेश सदस्यांना पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या गोंधळाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कॅरिआॅन देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. यावर निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अर्ध्या तासाच्या अंतरानेच तब्बल तीन वेळा बैठकीची तारीख आणि वेळ बदलल्याचे संदेश सदस्यांना पाठविण्यात आले आहेत.विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी (दि.११) व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना कुलगुरूंच्या आदेशानुसार अभियांत्रिकीच्या कॅरिआॅन प्रश्नावर आपत्कालीन बैठक बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता आयोजित केल्याचा संदेश पाठविला. यानंतर काही मिनिटातच ही बैठक १४ सप्टेंबर रोजी होणार असल्याचा संदेश पाठविला. यानंतर काही वेळातच पुन्हा आठवणीचा संदेश पाठविला. यास तास दीड तास होताच ही बैठक १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे संदेश मिळाल्याचे एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या दिवशी गौरी पूजन असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचेही सहा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे. यावरून विद्यापीठ प्रशासनाचे धरसोड धोरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र