शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल सेवेचा तीन तालुक्यांत बोजवारा

By admin | Updated: June 19, 2015 14:15 IST

मागील काही दिवसांपासून बीएसएनएल सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असतानाही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प आहेत

परंडा/भूम : मागील काही दिवसांपासून बीएसएनएल सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असतानाही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. सोमवारी देखील मोबाईलबरोबरच नेट सेवा विस्कळीत झाल्याने भूम, परंड्यासह वाशी तालुक्यांतील अनेक बँकाचे व्यवहार ठप्प झाले. याचा फटका या परिसरातील हजारो खातेदार शेतकऱ्यांना बसला.

  • तीन तालुक्यांतील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, खरीप पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीकरीता शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने बँक व इतर कार्यालयात गर्दी होणे अपेक्षितच असते. शेतकरी मोठ्या आशेने बँकेतून पैसे काढून बी-बियाणे खरेदी करावेत या हेतूने बाहेर पडले होते. मात्र बीएसएनएलची नेटसेवा बंद पडल्याने अनेक बँकाचे व्यवहार ठप्प झाले.

    त्यातच सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने चाकरमान्यांनी पाल्यांना दप्तर, वह्या घेण्याकरिता पैशाच्या गरजेपोटी बँकेत गर्दी केली होती. परंतु त्यांचाही भ्रमनिरास झाला. याचबरोबर बीएसएनएलचे मोबाईलही बंद पडल्यामुळे अनेक बीएसएनएल धारकांची गैरसोय झाली. एरव्ही बँकात पाय ठेवण्यास जागा नसते. परंतु आज बँकेत शुकशुकाट दिसून आला. या संदर्भात दूरसंचार विभागाकडे चौकशी केली असता, कळंब, उस्मानाबाद या दोन शहराच्यामध्ये दूरसंचार सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे भूम-परंडा व वाशी या तिन्ही तालुक्यांत बीएसएनएल ची सेवा बंद असल्याची माहिती मिळाली.सदर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच मोबाईल व नेट सेवा सुरु होईल, असे कनिष्ठ अभियंता सी.पी. पाठक यांनी सांगितले. (वार्ताहर)

    जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा मागील काही महिन्यांपासून सातत्याने विस्कळीत होत आहे. याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. बीएसएनएलच्या उस्मानाबाद येथील वरिष्ठांकडेही यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याचे अनेकांनी सांगितले. बीएसएनएलचे जिल्हाभरातील महत्त्वाचे अधिकारी मुख्यालयी रहात नसल्याने दाद कोणापुढे मागायची, अशी व्यथा अनेक ग्राहकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. सेवा ठप्प होण्याबरोबरच इतर किरकोळ तक्रारीही दिवसेंदिवस वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे खाजगी स्पर्धकांना मात्र मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे.

    ४मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा वारंवार ठप्प होत आहे. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर केबल तुटल्याचे कारण सांगून वेळ मारुन नेहली जाते. केबलचे काम सातत्याने जिल्ह्यात कुठे ना कुठे सुरु असते. मात्र दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होऊन समस्या संपत नसल्याने केबल दुरुस्तीवर होणारा खर्च केवळ गुत्तेदार जगविण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बीएसएनएल सेवेच्या त्रुटीसंदर्भात उस्मानाबाद येथील कार्यालयात तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने हा ग्राहक नाविलाजाने खाजगी सेवेकडे वळत आहे. मात्र याचेही अधिकाऱ्यांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.