शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

लाचप्रकरणी तिघांचेच निलंबन

By admin | Updated: July 11, 2016 01:13 IST

औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

औरंगाबाद : लाच घेतल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाच्या बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास परवानगी देण्याची प्रकरणे मात्र शासनस्तरावर प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील सात जणांविरुद्ध गेल्या दोन वर्षांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश होता, जिल्हा प्रशासनाने यापैकी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करून दोघांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यास परवानगी दिली आहे. औरंगाबाद तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील लिपिक गंगाधर गायकवाड यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २४ जुलै २०१५ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशासनाने त्यांना यावर्षी ३ मार्च रोजी निलंबित करून त्याच दिवशी खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. बनोटी (ता. सोयगाव) सज्जाचे तलाठी भगतसिंग पवार यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात १२ आॅगस्ट २०१४ रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांच्यावर २३ मार्च २०१५ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली तसेच १० मार्च २०१६ रोजी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. बोडखा (ता. खुलताबाद) सज्जाचे तलाठी शेख अय्युब पापामियाँ यांच्याविरुद्ध २१ जानेवारी रोजी लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १४ मार्च रोजी निलंबित करण्यात आले. अय्युब यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. वैजापूरच्या तहसील कार्यालयातील लिपिक दिलीपसिंह पवार यांच्याविरुद्ध १२ सप्टेंबर २०१४ रोजी वैजापूर ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.अडकुणे, पडघन यांच्यावर कारवाई नाहीऔरंगाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी २०१३ रोजी लाचेचा गुन्हा दाखल झाला होता. अडकुणे यांना निलंबित न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सध्या ते पालघर येथे उपजिल्हाधिकारी आहेत. वैजापूरचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत पडघन यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पडघन यांनादेखील महसूल खात्याने निलंबित केले नाही. या दोघांविरुद्ध खटला दाखल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.तलाठ्यांचे प्रस्ताव केले परतलाचेच्या सापळ्यात अडकलेल्या तलाठ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यास परवानगी मागणारे प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते. तलाठी संवर्गातील कर्मचारी हे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करीत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे गरजेचे होते. टाकळी कदीम (ता. गंगापूर) येथील तत्कालीन तलाठी इंद्रभान सोनवणे यांच्याविरुद्ध दौलताबाद ठाण्यात ३१ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनवणे यांच्याबाबतचा प्रस्ताव वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणे गरजेचे होते. त्यामुळे हा प्रस्ताव लाचलुचपत विभागाकडे परत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.