शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासात गुन्हेशाखेने ठोकल्या  बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:51 IST

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हेशाखेने २४ तासात बेड्या ठोकल्या. सागर सुभाष बुट्टे(वय २०), उमेश उत्तम डुकळे(वय२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड(वय२६,सर्व रा.जयभवानीनगर)असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

औरंगाबाद, दि. ९ : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हेशाखेने २४ तासात बेड्या ठोकल्या. सागर सुभाष बुट्टे(वय २०), उमेश उत्तम डुकळे(वय२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड(वय२६,सर्व रा.जयभवानीनगर)असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. 

या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की,गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती.यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो,चल असे म्हणून रिक्षात बसविले.

यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला घेऊन विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आला,असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. अमानुष अत्याचार  केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवले. यानंतर घटनेची कोठेही वाच्यता केल्यास, तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपीं आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली.यानंतर ती घरी गेली.घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली. रविवारी दुपारी पीडिता पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. तेथे तिने नराधमांविरूद्ध फिर्याद नोंदविली. 

अशी झाली अटकघटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकाँ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी,सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी,धर्मराज  गायकवाड,लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी मोठ्या शिताफीने सागरसह अन्य दोन जणांना बीड बायपास परिसरातून पकडले.