शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:39 IST

औरंगाबाद : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

औरंगाबाद : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. बसस्थानकात मंगळवारी ‘एटीएस’ आणि ‘क्यूआरटी’ पथकाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या त्रुटींविषयी पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये सुधारणा करण्याची कडक सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.२१ जून रोजी मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसमध्ये पार्सलचा स्फोट झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारास सुरक्षेसंदर्भात सूचना करण्यात आल्या; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मंगळवारी झालेल्या पाहणीत दिसले. पार्सल तपासणीसाठी स्कॅनरसारखी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पार्सल पूर्णपणे तपासून घेणे, स्कॅनर घेणे, कार्यरत कर्मचाऱ्यांची पडताळणी करून नेमणूक करणे इ. सूचना करण्यात आल्या.बसस्थानक, आगार परिसरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; परंतु त्यांची संख्या अपुरी आहे. शिवाय काही कॅमेरे योग्य दिशेत बसविण्यात आलेले नाहीत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर फेरीवाले, हातगाड्या उभ्या केल्या जातात. यासंदर्भात काळजी घेण्याची सूचना करण्यात आली. रात्रीच्या वेळी आगारात बसेस उभ्या केल्या जातात. अशा वेळी या बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सर्वाधिक खबरदारी घ्यावी. सुरक्षारक्षक अपुरे असून जे आहेत त्यांनी दक्ष राहावे, असे पथकाकडून सांगण्यात आले. यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या असून त्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.