शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

लवकरच तीन स्वतंत्र पोलीस चौक्या

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. मुकुंदवाडी, क्रांतीचौक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

औरंगाबाद : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. मुकुंदवाडी, क्रांतीचौक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही ठाण्यांचे विभाजन करून तेथे अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून शासनाकडे पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आणि वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर शहरात तीन पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत.पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत मुकुंदवाडी आणि क्रांतीचौक ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. यावर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत मुकुंदवाडी ठाण्यात ७७५ तर क्रांतीचौक ठाण्यात ७५० गुन्हे नोंदविण्यात आले. या दोन्ही ठाण्यांचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या ठाण्यांचे विभाजन करून अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव २०१० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शासनास सादर केलेला आहे. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. नवीन ठाणे मंजूर होईपर्यंत या दोन्ही ठाण्यांतर्गत स्वतंत्र पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी वर्गही देण्यात येत आहे.