शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

लवकरच तीन स्वतंत्र पोलीस चौक्या

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. मुकुंदवाडी, क्रांतीचौक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

औरंगाबाद : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. मुकुंदवाडी, क्रांतीचौक ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही ठाण्यांचे विभाजन करून तेथे अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून शासनाकडे पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आणि वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर शहरात तीन पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत.पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत मुकुंदवाडी आणि क्रांतीचौक ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. यावर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत मुकुंदवाडी ठाण्यात ७७५ तर क्रांतीचौक ठाण्यात ७५० गुन्हे नोंदविण्यात आले. या दोन्ही ठाण्यांचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या ठाण्यांचे विभाजन करून अनुक्रमे विमानतळ पोलीस ठाणे आणि वेदांतनगर पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव २०१० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शासनास सादर केलेला आहे. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. नवीन ठाणे मंजूर होईपर्यंत या दोन्ही ठाण्यांतर्गत स्वतंत्र पोलीस चौक्या सुरू करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी वर्गही देण्यात येत आहे.