शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाळूजमध्ये लाखभर लोकांसाठी तीन रेशन दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:50 IST

वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावची लोकसंख्या एक लाखावर पोहचली असून, या भागात केवळ तीनच स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे स्वस्त अन्न धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. स्वस्त अन्न धान्य मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांना खुल्या बाजारातून महागड्या भावाने अन्न-धान्याची खरेदी करावी लागत आहे. या परिसरात स्वस्त धान्याची वाढीव दुकाने सुरु करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावची लोकसंख्या एक लाखावर पोहचली असून, या भागात केवळ तीनच स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे स्वस्त अन्न धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. स्वस्त अन्न धान्य मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांना खुल्या बाजारातून महागड्या भावाने अन्न-धान्याची खरेदी करावी लागत आहे. या परिसरात स्वस्त धान्याची वाढीव दुकाने सुरु करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

उद्योगनगरीमुळे बजाजनगर व वडगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला परिसराची लोकसंख्या एक लाखावर पोहचली आहे. बहुतांश कामगार कंत्राटी पद्धतीने मिळेल ती कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहर करतात. या भागात वडगाव येथे एक तर बजाजनगरात दोन स्वस्त धान्य दुकाने आहेत. या तीनही दुकानांत अन्नधान्य खरेदीसाठी नागरिकांची कायम झुंबड उडते. अनेकांना कामाला दांडी मारुन स्वस्त अन्न-धान्य खरेदीसाठी दुकानावर तासन-तास प्रतिक्षा करावी लागते. स्वस्त धान्य दुकानासमोर लांबच-लांब रांगा लागत असल्याने शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत.

शिधापत्रिका असुनही धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर आहे. या परिसरात स्वस्त धान्य दुकानाची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, विश्वंभर सदमे, धनराज पवार, रविंद्र माळी, विजय सुर्यवंशी, बजरंग पाटील आदींनी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. वाढीव स्वस्त दुकाने सुरु करण्यासाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित करुन तहसीलदार व पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

मात्र स्वस्त धान्याची दुकानांची संख्या वाढविण्यात पुरवठा विभागाकडून टोलवा-टोलवी केली जात असल्याने कामगारांत संतापाचे वातावरण पसरले आहे. पुरवठा विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

खुल्या बाजारातून धान्याची खरेदीपरिसरातील तीन स्वस्त धान्य दुकानांसमोर कायम गर्दी होत असल्याने कामगारांची परवड होत आहे. अनेक शिधापत्रिकाधारक कामगारांना खुल्या बाजारातून धान्याची खरेदी करावी लागत आहे. स्वस्त धान्य दुकानाची संख्या वाढविण्याची मागणी कामगार वर्गातून केली जात आहे.

 

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद