शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

बिबट्याची तीन पिले आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:23 IST

कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.

लोकमत न्यूज नेटवर्कहतनूर : कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.त्यांना बघताच त्यांच्या पाचावर धारण बसली. या कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर जवळपास ५० शेतकरी जमा झाले. अर्धा तास त्या पिलांना शेतकरी व कामगारांनी पकडून ठेवले. परंतु पिले पाहून बिबट्या हल्ला करेल, या भितीने त्यांनी ही पिले ऊसाच्या फडात सोडून दिले.वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, वनपाल एल.व्ही.घुगे, आर. व्ही. शिंदे, वनरक्षक एम. आर. गुरसाळे, एन.के. घोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या वन कर्मचारी परिसरातच ठाण मांडून असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांनी सांगितले.वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा व त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोपट राजपूत, संजय भेंडाळे, साहेबराव शिरसाठ, बाबासाहेब पवार आदींसह ग्रामस्थानी केली आहे.दोन वर्षांपासून जैतापूर, आलापूर, हतनूर, केसापूर, टापरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. या संपूर्ण परिसरात उसाचे घनदाट क्षेत्र असल्याने बिबट्याने अजून तरी स्थलांतर न केल्याने शेतकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटे हे नर मादी तर आहेतच. मात्र तिन्ही पिले आढळल्याने शाळकरी मुलांसह शेतकरी, महिला, मजूरही घाबरलेले आहेत.