शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख भाविक दाखल

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़

श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़ गर्दीचे व्यवस्थापन करताना संस्थानासह एसटी महामंडळ व पोलिसांची दमछाक होत आहे़दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान, श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री देवदेवेश्वर संस्थान, शेख फरीदाबाद दर्गाह या देवस्थानांवर भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ परंतु भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होवून शहरात पहिल्याच दिवशी ३ लाखांवर भाविक आल्याने पोलिस व एसटी महामंडळास व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ दर्शनासाठी आलेले ९० टक्के भाविक ४५ कि़मी़ची परिक्रम यात्रा पायी करीत असल्याने पोलिसांना जंगलासह अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावावा लागला़ तर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांना ठिकठिकाणी चहा, फराळ, पाणी पाऊच वाटून सेवा करण्याचा आनंद घेत होते़ भाविक देवतांच्या नावाच्या जयघोषात पायी मार्गक्रमण करीत होते़पोलिस निरीक्षक डॉ़अरूण जगताप, सपोनि अनिल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांच्यासह पोलिसांनी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकावरून भाविकांना सूचना देणे, एसटीमध्ये चढताना-उतरताना भाविकांची काळजी घेणे, गडावरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवू न देणे व इतर समस्या तत्काळ सोडविण्याची खबरदारी घेत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़ एसटी महामंडळाने भाविकांची वाहतूक करण्यासाठी १०० बसेसची व्यवस्था करूनही बसेस कमी पडल्याने आगारप्रमुख पडवळ, यात्राप्रमुख बेग यांनी स्वत: घाटात वाहतुकीची कोंडी होवू नये, यात्रिकांना त्रास होवू नये याची खबरदारी घेत असल्याचे दिसून आले़ (वार्ताहर)यात्रेत आलेले भाविक ४५ कि़मी़चे अंतर २४ तासापर्यंत चालून पूर्ण करत असून भाविकांच्या सोयीसाठी पोलिस, एसटी महामंडळ पूर्ण दक्षतेने सेवा देत आहेत़ श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी स्वयंसेवी संस्थासह दानशूर व्यक्तींकडून महाप्रसाद, अन्नदान करण्यात येत असल्याची माहिती पी़डी़चव्हाण यांनी दिली असून यासह सर्वच देवस्थानांवर अन्नदान महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे़