शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे कोटींचा फटका !

By admin | Updated: August 9, 2015 00:28 IST

उस्मानाबाद : वरूणराजाच्या अवकृपेमुळे खरीप पिके हातची गेली आहेत. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद : वरूणराजाच्या अवकृपेमुळे खरीप पिके हातची गेली आहेत. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग आणि सोयाबीनच्या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल कृषी विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हाभरात मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक संकटाचा सामना करवा लागत आहे. यंदा तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. परंतु, घडले उलट. जिल्ह्याच्या काही भागात सुरूवातील पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यानंतर लागलीच संबंधित भागातील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. मोठ्या पावसाच्या भरावशावर ३ लाख ९२ हजारांपैकी तब्बल १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सदरील पिकांची उगवण झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यानंतर एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाची पिके जमिनोध्वस्त झाली आहेत. उडीद पिकाची २१ हजार ३७३ हेक्टवर पेरणी झाली होती. प्रति हेक्टरी सरासरी ४४१ एवढी उत्पादकता गृहित धरली असता ९४ हजार २५४.०३ क्टिंवल उत्पादन अपेक्षित होते. त्यास ४ हजार ३५० रूपये हमीभाव गृहित धरल्यास अंदाजे ४ हजार १०० लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.हीच स्थिती मूूग या पिकाच्या बाबतीत आहे. १० हजार १२२ हेक्टवर या पिकाची पेरणी करण्यात आली होती. याची सरासरी उत्पादकता ४२९ क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. त्यामुळे उपरोक्त पेऱ्याच्या माध्यमातून ४३ हजार ४२४.३८ क्विंटल उत्पादन मिळाले असतो. त्यास ४ हजार ६०० रूपये एवढा हमीभाव गृहित धरले असता तब्बल १ हजार ९९७.४८ लक्ष रूपयांचा फटका बसला आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने सोयाबीनखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यंदाही शेतकऱ्यांनी याच पिकाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येते. ८९ हजार ११६ हेक्टवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. प्रतिहेक्टरी सरासरी १२८६ किलो एवढी उत्पादकता आहे. परंतु, अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. बहुतांश ठिकाणचे सोयाबीन करपून गेले आहे. वेळेवर पाऊस पडला असता तर २९ हजार ३३८ लाख रूपये एवढे उत्पन्न मिळाले असते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सदरील नुकसानीचा अहावाल नुकताच शासनाला सादर करण्यात आला आहे. एकूण नुकसानीचा अंदाजे आकडा ाहा ३५ हजार ४३५.९८ लक्ष रूपये (३५४ कोटी) एवढा मोठा आहे. (प्रतिनिधी) जिल्हाभरात मिळून १० हजार १२२ हेक्टवर मूग, २१ हजार ३७३ हेक्टवर उडीद, ८९ हजार ११६ हेक्टवर सोयाबीन आणि २६ हजार ३०० हेक्टवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली होती. परंतु, ही सर्व पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे पेरणी न झालेले आणि पिके वाया गेलेल्या १ लाख ४६ हजार ९९१ हेक्टवर क्षेत्रावर दुबार पेरणी करणे शक्य नाही, असे कृषी विभागाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ४२ महसूल मंडळापैकी १७ मंडळामध्ये ७५ मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. ८ मंडळांमध्ये ७५ ते १०० मिमी दरम्यान पाऊस पडला आहे. ११ मंडळामध्ये १०० ते १२५ मिमी, तीन मंडळामध्ये १२५ ते १५० मिमी आणि उर्वरित तीन मंडळामध्ये १५० मिमी एवढा पाऊस झाला आहे. या अत्यल्प स्वरूपाच्या पावसामुळेच खरीप पिके वाया गेली आहेत.जिल्ह्यातील ७३७ पैकी उस्मानाबाद तालुक्यातील ५०, तुळजापूर तालुक्यातील २०, परंडा तालुक्यातील ९, भूम तालुक्यातील ११ अशा एकूण ९० गावांमध्ये पेरणीच झालेली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.