शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 11:35 IST

संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

आष्टी (जि. जालना) : परतूर तालुक्यातील आष्टीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या संकणापुरी येथील तीन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ मार्च २२ रोजी हे तिघेजण गावाशेजारी ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते.

या घटनेने संकणापुरी येथे सायंकाळी चूल पेटली नाही. संकणापुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अजय रघुनाथ टेकाळे (वय १३), करण बाळासाहेब नाचण (१०) आणि उमेश बाळासाहेब नाचण (वय १०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महसूल विभागाने पंचनामा केला आहे. सकाळी साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर हे तिघेजण गावाशेजारील ओढ्यात असलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचे दप्तर पाण्याच्या काठावर ठेवल्याने त्यांचा शोध लागला. शाळा सुटल्यावर दोन तास उलटल्यावरही मुले घरी आली नाहीत, याची चौकशी करण्यासाठी पालकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कोणीतरी मुलांची दप्तरे ही ओढ्याजवळ असल्याचे सांगितले.

त्यामुळे ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. मोठ्या प्रयत्नाने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यावर आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचे अश्रू आवरतांना गावकरीही शोकमग्न झाले होते. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी चार वाजेनंतर मृतदेह बाहेर काढल्यावर त्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावकरी हजर होते. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. तेथे रात्री चूलही पेटली नसल्याचे सांगितले. दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास परतूरच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalanaजालना