शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

तीन रेल्वे उड्डाणपुलांना मिळाली मंजुरी

By admin | Updated: July 13, 2017 00:33 IST

परभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून, परभणी व परतूरच्या दोन पुलांसाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या उड्डाणपुलांच्या कामाच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे़ परभणी ते जालना रेल्वे मार्गावर दिवसभरात जवळपास १६० रेल्वे गाड्यांची ये-जा असते़ रेल्वे आल्यानंतर उड्डाणपूल नसल्याने रेल्वेमार्गावरील प्रमुख रस्त्यांचे फाटक बंद करण्यात येते़ परिणामी दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे किमान वर्दळीच्या रस्त्यांवर तात्काळ उड्डाण पूल उभारावेत, अशी नागरिकांची मागणी होती; परंतु, ही मागणी मंजूर होत नव्हती़ वर्दळीच्या रस्त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचा तसेच मानवत रोड येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रस्त्याचा आणि परतूर येथील रस्त्याचाही समावेश आहे़ या तिन्ही ठिकाणी प्राधान्याने रेल्वे उड्डाणपूल उभारावेत, यासाठी खा़ बंडू जाधव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे भेट घेतली होती़ त्यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवत उड्डाणपुलांना मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन खा़ जाधव यांना दिले होते़त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या तिन्ही मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरुन कृषी विद्यापीठात जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूर मंजूर करण्यात आली आहे़यामध्ये केंद्र शासन २४ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार ३९ कोटी रुपयांचा निधी देणार आहे़याशिवाय परतूर येथील रेल्वे पुलासाठी केंद्र सरकार १७ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार २७ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे़ अशा ४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे़ येत्या महिनाभराच्या आत या दोन्ही रेल्वे पुलांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत़