शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

तीन रेल्वे उड्डाणपुलांना मिळाली मंजुरी

By admin | Updated: July 13, 2017 00:33 IST

परभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून, परभणी व परतूरच्या दोन पुलांसाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या उड्डाणपुलांच्या कामाच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे़ परभणी ते जालना रेल्वे मार्गावर दिवसभरात जवळपास १६० रेल्वे गाड्यांची ये-जा असते़ रेल्वे आल्यानंतर उड्डाणपूल नसल्याने रेल्वेमार्गावरील प्रमुख रस्त्यांचे फाटक बंद करण्यात येते़ परिणामी दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे किमान वर्दळीच्या रस्त्यांवर तात्काळ उड्डाण पूल उभारावेत, अशी नागरिकांची मागणी होती; परंतु, ही मागणी मंजूर होत नव्हती़ वर्दळीच्या रस्त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचा तसेच मानवत रोड येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रस्त्याचा आणि परतूर येथील रस्त्याचाही समावेश आहे़ या तिन्ही ठिकाणी प्राधान्याने रेल्वे उड्डाणपूल उभारावेत, यासाठी खा़ बंडू जाधव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे भेट घेतली होती़ त्यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवत उड्डाणपुलांना मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन खा़ जाधव यांना दिले होते़त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या तिन्ही मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरुन कृषी विद्यापीठात जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूर मंजूर करण्यात आली आहे़यामध्ये केंद्र शासन २४ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार ३९ कोटी रुपयांचा निधी देणार आहे़याशिवाय परतूर येथील रेल्वे पुलासाठी केंद्र सरकार १७ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार २७ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे़ अशा ४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे़ येत्या महिनाभराच्या आत या दोन्ही रेल्वे पुलांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत़