शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने उडाली खळबळ

By admin | Updated: November 9, 2016 01:42 IST

पूर्वतयारी करणे आवश्यक होते काळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये

पूर्वतयारी करणे आवश्यक होतेकाळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये १०० च्या नोटा मुबलक प्रमाणात ठेवणे आवश्यक होते. हजार,पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागतील, पण १००, ५० रुपयांच्या नोटा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होणे सध्या तरी अशक्य आहे. प्रॅक्टिकली मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. - देवीदास तुळजापूरकर, माजी संचालक, महाराष्ट्र बँकटेबल खालून होणाऱ्या व्यवहारांना लगामकाळा पैसा एकाच रात्री कसा संपवायचा, याचे उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. यामुळे ‘टेबल खालून ’ होणाऱ्या व्यवहारांना लगाम बसेल. तसेच काळा पैसा बाळगणाऱ्यांनाही या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे. यामुळे नकली नोटा बाजारात आणून हत्यारे खरेदी करणाऱ्या आतंकवाद्यांच्या आर्थिक नाड्या बंद होतील. याचा कॉर्पोरेट क्षेत्राला कोणतेही नुकसान नाही. तसेच जे बांधकाम व्यावसायिक किफायतशीर दरात थेट गरजू ग्राहकांना घरे विकतात त्यांनाही काहीच नुकसान नाही. मात्र,जिथे गुंतवणूक आहे. काळा पैसा आहे, खोटे काम आहे अशा लोकांना अडचणी येऊ शकतात. देवानंद कोटगिरे, बांधकाम व्यावसायिकअतिशय चांगला निर्णयपंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला निर्णय अतिशय चांगला आहे. देशातील काळा पैसा यानिमित्ताने बाहेर येईल. ज्यांनी हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा साठा करून ठेवला आहे, तो साठा बाहेर काढताना त्यांना त्याचा अधिकृत हिशेब द्यावा लागेल. बेकायदेशीर सर्व व्यवहार ठप्प होतील.-उपमहापौर प्रमोद राठोडव्यवहारात अडचणी५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नव्या नोटा येईपर्यंत १०० रुपयांच्या नोटांवर व्यवहार करणे अशक्य होईल. शंभरच्या नोटांमुळे मोठी रक्कम बाळगणे अवघड होईल.-किशोर वाघमारेकाळ्या पैशाला बसेल खीळदेशासमोर काळ्या पैशाचे संकट निर्माण झाले होते; परंतु प्रश्न सुटत नव्हता, अशा परिस्थितीत मोठ्या मूल्यांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचे व्यवहार होत असत, त्याला आता खीळ बसणार आहे. सद्य:स्थितीत काही ठराविक लोकांच्याच हाती पैसा खुळखुळत होता, तर मोठा घटक पैशापासून वंचित राहत होता. आता या वंचित घटकांनाही पैसे मिळतील. - प्रा. डॉ. सर्जेराव ठोंबरे, अर्थतज्ज्ञरोखतेची समस्या होईलपैशाची मागणी असताना पुरवठा न झाल्यास बाजारात पैशांची कमतरता निर्माण होईल. लोकांच्या हातात पैसा उपलब्ध झाला नाही तर वस्तूंची मागणी कमी होऊ शकते, यातून मंदीसारखी समस्या उद्भवेल. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्था बनलेल्या काळ्या पैशाला लगाम बसेल. काळ्या पैशांसाठी हा धाडसी निर्णय आहे.डॉ. आर. एस. सोळुंके, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञमास्टर स्ट्रोक अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या काळात ज्यांनी आपली अघोषित संपत्ती जाहीर केली नाही त्यांच्याकडील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणून ‘मास्टर स्ट्रोक’ मारला. एकदम धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता आपला पैसा पांढरा करण्यासाठी ‘पळवाट’ राहिली नाही. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. - रेणुका देशपांडे, अध्यक्षा सीए असोसिएशनना भूतो ना भविष्यति निर्णय ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद करून पंतप्रधान मोदी यांनी ‘ना भूतो ना भविष्यति’ निर्णय घेतला आहे. ऐन उत्तरप्रदेशच्या निवडणुकीआधी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थकारणात हृदयविकाराचा झटका येईल. मात्र, काही दिवसांनंतर बायपास झाल्यावर ‘काळ्या पैशा’ला देशात थारा राहणार नाही. कोणी काळा पैसा बाळगणार नाही, तसेच काळा पैसा बाळणारे यातून सुटणार नाहीत. ज्यांचे नगदी व्यवहार आहेत त्यांना दैनंदिन व्यवहारात अडचणी येतील. मात्र, ज्यांचे पुस्तकी व्यवहार आहे त्यांना काही नुकसान होणार नाही. - उमेश शर्मा, सीए