शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने उडाली खळबळ

By admin | Updated: November 9, 2016 01:42 IST

पूर्वतयारी करणे आवश्यक होते काळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये

पूर्वतयारी करणे आवश्यक होतेकाळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये १०० च्या नोटा मुबलक प्रमाणात ठेवणे आवश्यक होते. हजार,पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागतील, पण १००, ५० रुपयांच्या नोटा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होणे सध्या तरी अशक्य आहे. प्रॅक्टिकली मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. - देवीदास तुळजापूरकर, माजी संचालक, महाराष्ट्र बँकटेबल खालून होणाऱ्या व्यवहारांना लगामकाळा पैसा एकाच रात्री कसा संपवायचा, याचे उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. यामुळे ‘टेबल खालून ’ होणाऱ्या व्यवहारांना लगाम बसेल. तसेच काळा पैसा बाळगणाऱ्यांनाही या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे. यामुळे नकली नोटा बाजारात आणून हत्यारे खरेदी करणाऱ्या आतंकवाद्यांच्या आर्थिक नाड्या बंद होतील. याचा कॉर्पोरेट क्षेत्राला कोणतेही नुकसान नाही. तसेच जे बांधकाम व्यावसायिक किफायतशीर दरात थेट गरजू ग्राहकांना घरे विकतात त्यांनाही काहीच नुकसान नाही. मात्र,जिथे गुंतवणूक आहे. काळा पैसा आहे, खोटे काम आहे अशा लोकांना अडचणी येऊ शकतात. देवानंद कोटगिरे, बांधकाम व्यावसायिकअतिशय चांगला निर्णयपंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला निर्णय अतिशय चांगला आहे. देशातील काळा पैसा यानिमित्ताने बाहेर येईल. ज्यांनी हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा साठा करून ठेवला आहे, तो साठा बाहेर काढताना त्यांना त्याचा अधिकृत हिशेब द्यावा लागेल. बेकायदेशीर सर्व व्यवहार ठप्प होतील.-उपमहापौर प्रमोद राठोडव्यवहारात अडचणी५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नव्या नोटा येईपर्यंत १०० रुपयांच्या नोटांवर व्यवहार करणे अशक्य होईल. शंभरच्या नोटांमुळे मोठी रक्कम बाळगणे अवघड होईल.-किशोर वाघमारेकाळ्या पैशाला बसेल खीळदेशासमोर काळ्या पैशाचे संकट निर्माण झाले होते; परंतु प्रश्न सुटत नव्हता, अशा परिस्थितीत मोठ्या मूल्यांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचे व्यवहार होत असत, त्याला आता खीळ बसणार आहे. सद्य:स्थितीत काही ठराविक लोकांच्याच हाती पैसा खुळखुळत होता, तर मोठा घटक पैशापासून वंचित राहत होता. आता या वंचित घटकांनाही पैसे मिळतील. - प्रा. डॉ. सर्जेराव ठोंबरे, अर्थतज्ज्ञरोखतेची समस्या होईलपैशाची मागणी असताना पुरवठा न झाल्यास बाजारात पैशांची कमतरता निर्माण होईल. लोकांच्या हातात पैसा उपलब्ध झाला नाही तर वस्तूंची मागणी कमी होऊ शकते, यातून मंदीसारखी समस्या उद्भवेल. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्था बनलेल्या काळ्या पैशाला लगाम बसेल. काळ्या पैशांसाठी हा धाडसी निर्णय आहे.डॉ. आर. एस. सोळुंके, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञमास्टर स्ट्रोक अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या काळात ज्यांनी आपली अघोषित संपत्ती जाहीर केली नाही त्यांच्याकडील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणून ‘मास्टर स्ट्रोक’ मारला. एकदम धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता आपला पैसा पांढरा करण्यासाठी ‘पळवाट’ राहिली नाही. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. - रेणुका देशपांडे, अध्यक्षा सीए असोसिएशनना भूतो ना भविष्यति निर्णय ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद करून पंतप्रधान मोदी यांनी ‘ना भूतो ना भविष्यति’ निर्णय घेतला आहे. ऐन उत्तरप्रदेशच्या निवडणुकीआधी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थकारणात हृदयविकाराचा झटका येईल. मात्र, काही दिवसांनंतर बायपास झाल्यावर ‘काळ्या पैशा’ला देशात थारा राहणार नाही. कोणी काळा पैसा बाळगणार नाही, तसेच काळा पैसा बाळणारे यातून सुटणार नाहीत. ज्यांचे नगदी व्यवहार आहेत त्यांना दैनंदिन व्यवहारात अडचणी येतील. मात्र, ज्यांचे पुस्तकी व्यवहार आहे त्यांना काही नुकसान होणार नाही. - उमेश शर्मा, सीए