शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

सुमारे दीड लाख नागरिकांना त्रास

By admin | Updated: May 27, 2014 01:21 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात.

औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात. मागील चार महिन्यांपासून विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाला सहा महिन्यांपासून उपअभियंताच नाही. त्यामुळे दुरुस्तीची शेकडो कामे ठप्प पडली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी विविध वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येतात. यंदा उन्हाळ्यात वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणार्‍या वॉर्डांमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावर गंभीर समस्या निर्माण होणार आहे. १६ वॉर्डांमध्ये ठिकठिकाणी मिळून शंभरहून अधिक लिकेज आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास पावसाचे साचलेले पाणी जलवाहिन्यांमध्ये जाईल. त्यामुळे दूषित पाणी नागरिकांना पिण्याची वेळ येणार हे निश्चित. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे दीड लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला उपअभियंता द्यावा, अशी मागणी वॉर्डातील दहापेक्षा अधिक नगरसेवकांनी प्रशासनाला केली. मात्र, प्रशासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंताच मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहत आहेत. अलीकडेच कार्यकारी अभियंताही आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग पोरका झाला आहे. कनिष्ठ अभियंत्याकडे उपअभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यास प्रशासन तयार नाही. दुसर्‍या वॉर्डातील उपअभियंत्याला अतिरिक्त कार्यभार देण्यासही टाळाटाळ होत आहे. (लोकमत ब्युरो) आंदोलनाचा इशारा वॉर्डाला उपअभियंताच नसल्याने पाणीपुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहेत. पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासनाने नवीन अधिकार्‍याची नेमणूक न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला अधिकारी द्यावा, या मागणीकडे मनपा प्रशासन गांभीर्याने बघायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.