शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

‘तदर्थ’च्या हजारो शिक्षकांना समित्यांमधून डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नॅक झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांनाच अध्यक्ष म्हणून नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यामुळे १९९१ ते २००० दरम्यान नेमणूक झालेल्या तदर्थ प्राध्यापकांना समित्यांमधून डावलण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय बदलण्याची मागणी; कुलगुरूंना निवेदन

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नॅक झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांनाच अध्यक्ष म्हणून नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यामुळे १९९१ ते २००० दरम्यान नेमणूक झालेल्या तदर्थ प्राध्यापकांना समित्यांमधून डावलण्यात येत आहे. याविरोधात विद्यापीठ विकास मंचतर्फे कुलगुरूंना निवेदन देत निर्णय बदलण्याची मागणी केली.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांनाच संलग्नता समित्या, विविध भरारी पथकांचे अध्यक्ष आणि ८ वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांना सदस्य म्हणून नेमण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. मात्र, तदर्थ प्राध्यापकांच्या सेवा १७ ते २५ वर्षांपेक्षा अधिक झालेल्या आहेत. या प्राध्यापकांना पदोन्नती मिळालेली नसल्यामुळे सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ज्या प्राध्यापकांना पात्रता पूर्ण केली त्यांच्या सेवा पात्रता मिळाल्यापासून ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, त्याचा निर्णय आलेला नाही. मात्र विद्यापीठ प्रशासनाने तदर्थ प्राध्यापक असलेल्या शेकडो प्राध्यापकांना २० वर्षांपेक्षा अधिकची सेवा बजावूनही समित्यांचे अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही. हा प्राध्यापकांवरचा अन्याय असणार आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयात तात्काळ दुरुस्ती करून नॅक झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य व किमान १२ वर्षे सेवा सातत्य असणाऱ्या प्राध्यापकांना अध्यक्ष म्हणून नेमणूक मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप, डॉ. गोविंद काळे, प्रा. सचिन कंदले, डॉ. कालिदास भांगे, डॉ. माधव फड, डॉ. व्यंकटेश लांब आदीच्या स्वाक्षºया आहेत.कोट,२० ते २५ वर्षे सेवा केलेल्या प्राध्यापकांना विविध समित्यांचे अध्यक्षपद मिळू नये, यासाठी व्यवस्थापन परिषद निर्णय घेते. मात्र, याच प्राध्यापकांकडून विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करून घेण्यात येतात. सर्वोच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित असताना असा निर्णय घेणे चुकीचे आहे. हा तात्काळ बदलला पाहिजे.- डॉ. गोविंद काळे, तदर्थ संघर्ष समिती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ