शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट

By बापू सोळुंके | Updated: January 22, 2024 19:55 IST

रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली

छत्रपती संभाजीनगर: ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, ते देशाची सत्ता बदलायला निघाल्याची खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर येथे पत्रकारांशी बोलताना केली. राम मंदीराचा निवडणूकीत आम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं, जो काम करतोय, त्यांनी फायदा घेतल्यास गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आ. सिरसाट म्हणाले की, आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यासह सर्वजण येत्या काही दिवसांत अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहाेत. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहे. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिक मध्ये आरती करत आहेत. स्वतःला विद्ववान समजणारे आता प्रभू रामावर प्रश्न विचारत आहेत. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही सिरसाट यांनी  पक्षप्रमुख ठाकरेंवर केला. स्वर्गीय बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका आणि योगदान नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं ,पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही, तर आनंदोत्सव असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊत आता गांधी अन् पवार यांचेही प्रवक्तेघरातली माणसं यांनी ठेवली नाही, मुंबईत पाणी शिरलं तेव्हा बाळासाहेबांना एकटं सोडून पळाले, हे दलाल आहेत. यांनी साहेबांना विकायला पण कमी केलं नसतं. खा. संजय राऊत हे सतत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर लक्ष ठेवून असतात. आता ते उबाठा पक्षासोबतच गांधी आणि पवार यांचेही प्रवक्ते बनल्याची टीका त्यांनी केली. देशात बदल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी घर सांभाळावे, यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही.

टिकणाऱ्या आरक्षणास वेळ लागतोमनोज जरांगे हे लाखो जनतेसह मुंबईला निघाले या आंदोलनाकडे सरकार का दुर्लक्ष करते, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. सिरसाट म्हणाले, जरांगे यांना जनतेचा पाठिंबा आहे.  पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देऊ असे सांगितले आहे. त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. जरांगे यांच्यासोबत लहान मुले, वृद्ध आहेत, त्यांची काळजी घ्यावी असे आमचे आवाहन आहे. आज आरक्षण दिलं तर लोक न्यायालयात जातील म्हणून आम्ही कायदेशीर आणि टीकणारे आरक्षण देणार आहे, त्यामुळे वेळ लागत असल्याचे सिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना