शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट

By बापू सोळुंके | Updated: January 22, 2024 19:55 IST

रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली

छत्रपती संभाजीनगर: ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, ते देशाची सत्ता बदलायला निघाल्याची खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर येथे पत्रकारांशी बोलताना केली. राम मंदीराचा निवडणूकीत आम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं, जो काम करतोय, त्यांनी फायदा घेतल्यास गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आ. सिरसाट म्हणाले की, आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यासह सर्वजण येत्या काही दिवसांत अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहाेत. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहे. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिक मध्ये आरती करत आहेत. स्वतःला विद्ववान समजणारे आता प्रभू रामावर प्रश्न विचारत आहेत. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही सिरसाट यांनी  पक्षप्रमुख ठाकरेंवर केला. स्वर्गीय बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका आणि योगदान नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं ,पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही, तर आनंदोत्सव असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊत आता गांधी अन् पवार यांचेही प्रवक्तेघरातली माणसं यांनी ठेवली नाही, मुंबईत पाणी शिरलं तेव्हा बाळासाहेबांना एकटं सोडून पळाले, हे दलाल आहेत. यांनी साहेबांना विकायला पण कमी केलं नसतं. खा. संजय राऊत हे सतत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर लक्ष ठेवून असतात. आता ते उबाठा पक्षासोबतच गांधी आणि पवार यांचेही प्रवक्ते बनल्याची टीका त्यांनी केली. देशात बदल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी घर सांभाळावे, यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही.

टिकणाऱ्या आरक्षणास वेळ लागतोमनोज जरांगे हे लाखो जनतेसह मुंबईला निघाले या आंदोलनाकडे सरकार का दुर्लक्ष करते, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. सिरसाट म्हणाले, जरांगे यांना जनतेचा पाठिंबा आहे.  पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देऊ असे सांगितले आहे. त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. जरांगे यांच्यासोबत लहान मुले, वृद्ध आहेत, त्यांची काळजी घ्यावी असे आमचे आवाहन आहे. आज आरक्षण दिलं तर लोक न्यायालयात जातील म्हणून आम्ही कायदेशीर आणि टीकणारे आरक्षण देणार आहे, त्यामुळे वेळ लागत असल्याचे सिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना