शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरास अटक

By admin | Updated: February 8, 2016 00:18 IST

लातूर : भरदिवसा महिलांच्या गळ््यातील दागिने हिसकावून पोबारा करणाऱ्या एका सराईत चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी परभणी शहरातून अटक केली आहे.

मनीष दळवी -- असुर्डेकेल्याने होत आहे रे ।आधी केलेचि पाहिजे ।।या उक्तीप्रमाणे केल्याने सर्व काही होऊ शकते, परंतु त्याला प्रयत्नांची साधना आवश्यक आहे. याचे वास्तव रुप दाखवू पाहात आहे. नायशी येथील वाघेश्वरी स्वयंसहायता शेतकरी गट १८ सुशिक्षित तरूण एकत्रित येऊन सिमला मिरचीसारखे सेन्सिटिव्ह उत्पन्न घेऊ पाहात आहे. अडीच एकर क्षेत्रात १५०० इंद्रा जातीची सिमला मिरचीची रोपे लागवड करण्यात आली आहेत. संपूर्ण जागा १८ सुशिक्षित तरुणांपैकीच आहे. यासाठी संपूर्ण प्रोजेक्टला ५ लाखांची गरज होती. रोपे, लागवड, पाण्याची पाईपलाईन, ठिबक सिंचन, शेड नेट, मलचिंग पेपर, नांगरणी, फवारणी, खते, कीटकनाशके, नांगरणी व लागवड यासाठी मुंबईकर ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात प्रत्येक रोपाला १ लीटर पाणी मिळत आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, यासाठी मलचिंग पेपर टाकण्यात आला आहे. कोकणात शेतीची अपुरी साधने आहेत. तरीही यावर मात करून या गटातील प्रत्येक सभासदाने अतोनात मेहनत घेतली. एक महिना दिवस - रात्र या शेती प्रकल्पात राबत होते.यामध्ये मोठे योगदान आहे ते गावचे सरपंच किशोर घाग यांचे!़ त्यांच्याच पुढाकाराने गणपती सणामध्ये मुंबईकर चाकरमान्यांची बैठक घेतली़ त्यामध्ये त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली़ रस्ते, विहिरी, पाखाड्या बांधून गावचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, तर गावातील सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम दिले पाहिजे, त्यांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. गावात २२०० एकर जमीन आहे, पैकी ५० एकर फक्त लागवडीखाली आहे. त्यासाठी सामूहिक शेती हे उत्कृष्ट साधन आहे.़ लागवड खर्चासाठी आपणाकडून सहकार्य मिळाले, तर तरुण सुशिक्षित बेरोजगारांना नक्कीच दिशा दाखवता येईल, तसेच चार पैसे कमावण्याचा चांगला मार्ग मिळेल. यासाठी मुंबईकर चाकरमान्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे या प्रकल्पासाठी, गावातील होतकरू मुलांसाठी ५ लाख रुपये उपलब्ध करून दिले. या प्रकल्पाची माहिती मिळताच आर. एच. सरतापे उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत एस. एम. ढोबळे, ए. व्ही. शेनदसे, एच. जी. भिंगार्डे, एच. डी. सरगरे या कृषी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट दिली व मार्गदर्शन केले. हा प्रकल्प पाहता नक्कीच यशस्वी होईल. त्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असा शब्दही दिला. कोकणातील एक चांगला प्रकल्प म्हणून लोक याकडे नक्कीच पाहतील. यामध्ये येऊ पाहणाऱ्यांना हा शेतीप्रकल्प पथदीप ठरेल़, असे सांगून शेतीप्रकल्पासंबंधी काही सूचनाही केल्या. यामध्ये कोकणातील जमिनीमध्ये झिंक व बोरॉन याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मातीचे परीक्षण करून घ्या. तसेच मातीचा जो सरींचा बेड तयार केला आहे, त्याची रुंदी एक मीटर असावी. फुलकिडे, पांढरीमाशी, नागाळी, मावा ही कीटके या उत्पादनासाठी घातक आहेत. तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळी फवारणी व वापरली जाणारी कीटकनाशके यांचा तक्ता तयार करा. तसेच बायरसारख्या कंपनीची कीटकनाशके वापरा़, या गोष्टींबाबत त्यांनी मोलाचा सल्ला दिला. श्री वाघेश्वरी शेतकरी स्वयंसहाय्यता गट, नायशीच्या नामफलकाचे अनावरण पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव व उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण यांच्या हस्ते करण्यात आले.विक्री नाशिकलाउत्पादन झालेली मिरची आॅनलाईन विकण्यासाठी नाशिक येथे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. तसेच अन्य व्यापाऱ्यांच्याही संपर्कात असल्याचे किशोर घाग यांनी सांगितले.आदर्श कामगिरीकोकणातील बेरोजगार तरूणांना हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे. कोकणात अजूनही पडिक जमिनीचे प्रमाण बरेच आहे. मुंबईकरांना सोबत घेत या पडिक जमिनी विकसित झाल्या तर कोकणची गरिबी संपेल.१५ लाखांचे उत्पन्न मिळेलपैशांचा प्रश्न सुटताच या तरुणांनी करिष्मा करुन दाखवला़ अहोरात्र मेहनत घेऊन १५०० रोपांची लागवड, ठिबक सिंचनाची व्यवस्था, नेटशेड उभारणे, नांगरणी, सरी पाडणे ही सर्व कामे केली़ २२ नोव्हेंबरला याचे बी रुजविले गेले़ २५ डिसेंबरला याची लागवड करण्यात आली. आज महिन्यातनंतर बऱ्याच रोपांना फुले आली आहेत. काही रोपांना मिरची धरली आहे़ अजून १५ दिवसांतनंतर चांगलेच पीक येईल. ९ महिन्यांच्या या पिकामध्ये साधारणत: १५० टन उत्पन्न मिळू शकते व १५ लाख रुपये मिळू शकतात, असे प्रकल्पाचे प्रमुख व सरपंच किशोर घाग यांनी सांगितले़