शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या साडेचार हजारावर कामांना कात्री !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. आजवर सुमारे १९ हजार २०२ कामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी यंत्रणेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे २०१६-१७ च्या आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजारावर कामांना कात्री लावल्याचे समोर आले आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे.या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी, माती नाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, लुज बोल्डर स्ट्रक्चर, बांध बंधिस्ती, साखळी सिमेंट नाला बांध, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नाला खोलीकरण-सरळीकरण, गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव दुरूस्ती, कालवा दुरूस्ती, वृक्षलागवड, रोपवाटीका आदी कामे हाती घेता येतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरात मिळून सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये कृषी विभागाकडे सर्वाधिक १५ हजार २४८ कामे होती. आजवर १४ हजार ३२१ कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वन विभागाकडे २६९ कामे देण्यात आली होती. ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. लघु सिंचन विभागाकडे २५९ कामे होती. यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला ३७४ कामे देण्यात आली होती. परंतु, आजवर पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. प्रशासनाच्या अहवालानुसार केवळ १३५ कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. जि.प.च्या अन्य विभागाकडूनही कामे करण्यात आली आहेत. २ हजार ८६ पैकी २ हजार ६२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रिचार्ज शाफ्टचीही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली होती. आजवर २ हजार ३७८ पैकी १ हजार ८१९ कामे पूर्ण झाली आहेत. मंजूर आणि झालेल्या एकूण कामांवर नजर टाकली असता आजही १ हजार ८२३ कामे पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सुमारे ४ हजार ५५८ कामे कमी मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जावू लागली आहे.(प्रतिनिधी)