शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या साडेचार हजारावर कामांना कात्री !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. आजवर सुमारे १९ हजार २०२ कामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी यंत्रणेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे २०१६-१७ च्या आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजारावर कामांना कात्री लावल्याचे समोर आले आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे.या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी, माती नाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, लुज बोल्डर स्ट्रक्चर, बांध बंधिस्ती, साखळी सिमेंट नाला बांध, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नाला खोलीकरण-सरळीकरण, गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव दुरूस्ती, कालवा दुरूस्ती, वृक्षलागवड, रोपवाटीका आदी कामे हाती घेता येतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरात मिळून सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये कृषी विभागाकडे सर्वाधिक १५ हजार २४८ कामे होती. आजवर १४ हजार ३२१ कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वन विभागाकडे २६९ कामे देण्यात आली होती. ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. लघु सिंचन विभागाकडे २५९ कामे होती. यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला ३७४ कामे देण्यात आली होती. परंतु, आजवर पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. प्रशासनाच्या अहवालानुसार केवळ १३५ कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. जि.प.च्या अन्य विभागाकडूनही कामे करण्यात आली आहेत. २ हजार ८६ पैकी २ हजार ६२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रिचार्ज शाफ्टचीही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली होती. आजवर २ हजार ३७८ पैकी १ हजार ८१९ कामे पूर्ण झाली आहेत. मंजूर आणि झालेल्या एकूण कामांवर नजर टाकली असता आजही १ हजार ८२३ कामे पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सुमारे ४ हजार ५५८ कामे कमी मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जावू लागली आहे.(प्रतिनिधी)