शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

‘जलयुक्त’च्या साडेचार हजारावर कामांना कात्री !

By admin | Updated: January 1, 2017 23:36 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. आजवर सुमारे १९ हजार २०२ कामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी यंत्रणेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे २०१६-१७ च्या आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजारावर कामांना कात्री लावल्याचे समोर आले आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे.या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी, माती नाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, लुज बोल्डर स्ट्रक्चर, बांध बंधिस्ती, साखळी सिमेंट नाला बांध, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नाला खोलीकरण-सरळीकरण, गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव दुरूस्ती, कालवा दुरूस्ती, वृक्षलागवड, रोपवाटीका आदी कामे हाती घेता येतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरात मिळून सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये कृषी विभागाकडे सर्वाधिक १५ हजार २४८ कामे होती. आजवर १४ हजार ३२१ कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वन विभागाकडे २६९ कामे देण्यात आली होती. ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. लघु सिंचन विभागाकडे २५९ कामे होती. यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला ३७४ कामे देण्यात आली होती. परंतु, आजवर पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. प्रशासनाच्या अहवालानुसार केवळ १३५ कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. जि.प.च्या अन्य विभागाकडूनही कामे करण्यात आली आहेत. २ हजार ८६ पैकी २ हजार ६२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रिचार्ज शाफ्टचीही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली होती. आजवर २ हजार ३७८ पैकी १ हजार ८१९ कामे पूर्ण झाली आहेत. मंजूर आणि झालेल्या एकूण कामांवर नजर टाकली असता आजही १ हजार ८२३ कामे पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सुमारे ४ हजार ५५८ कामे कमी मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जावू लागली आहे.(प्रतिनिधी)