शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:57 IST

corona virus in aurangabad : तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही.

ठळक मुद्देशहरात ६७ टन ऑक्सिजन क्षमतेची तयारीदररोज २५० ते ३०० जण बाधित आढळून येऊ शकतात.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवित हानी निश्चितच कमी होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आदी तयारी करून ठेवण्यात आली आहे, असे मत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत होता. नागरिकांना लसही मिळालेली नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही. मानसिकरीत्या आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. शहराला दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ६७ मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता तयार करून ठेवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत बाधित रुग्ण वाढतील. दररोज २५० ते ३०० जण बाधित आढळून येऊ शकतात. अनेकांनी पहिली किंवा दुसरी लस घेतलेली आहे. या कारणामुळे संसर्ग झाल्यानंतरही रुग्ण थेट मृत्यूच्या दाढेत जाणार नाहीत. लवकरात लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतील. लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होईल, असेही एक भाकीत आहे. त्यादृष्टीने गरवारे कंपनीच्या सहकार्याने बाल कोविड सेंटर उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ऑक्सिजनसह किमान ३५० बेड उपलब्ध होतील. त्यामुळे तिसरी लाट म्हणून अधिक घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मात्र, शासनाने ठरवून दिलेले नियम आणखी काही दिवस तरी पाळावेच लागतील.

शहर आणीबाणीच्या स्थितीतआज शहरात रुग्णसंख्या अटोक्यात आहे. असे असले तरी शहर पूर्णपणे सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या शहर आणीबाणीच्या स्थितीतून जात आहे. संकट कधी ओढवेल याचा नेम नाही. नागरिकांनी किमान पहिला डोस तरी घेऊन ठेवावा. संसर्ग झाला तरी जीव वाचेल, असेही पाण्डेय ायांनी नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद