शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:57 IST

corona virus in aurangabad : तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही.

ठळक मुद्देशहरात ६७ टन ऑक्सिजन क्षमतेची तयारीदररोज २५० ते ३०० जण बाधित आढळून येऊ शकतात.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवित हानी निश्चितच कमी होणार आहे. महापालिका प्रशासनाकडून ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आदी तयारी करून ठेवण्यात आली आहे, असे मत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत होता. नागरिकांना लसही मिळालेली नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही. मानसिकरीत्या आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. शहराला दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ६७ मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता तयार करून ठेवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत बाधित रुग्ण वाढतील. दररोज २५० ते ३०० जण बाधित आढळून येऊ शकतात. अनेकांनी पहिली किंवा दुसरी लस घेतलेली आहे. या कारणामुळे संसर्ग झाल्यानंतरही रुग्ण थेट मृत्यूच्या दाढेत जाणार नाहीत. लवकरात लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतील. लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होईल, असेही एक भाकीत आहे. त्यादृष्टीने गरवारे कंपनीच्या सहकार्याने बाल कोविड सेंटर उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे ऑक्सिजनसह किमान ३५० बेड उपलब्ध होतील. त्यामुळे तिसरी लाट म्हणून अधिक घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मात्र, शासनाने ठरवून दिलेले नियम आणखी काही दिवस तरी पाळावेच लागतील.

शहर आणीबाणीच्या स्थितीतआज शहरात रुग्णसंख्या अटोक्यात आहे. असे असले तरी शहर पूर्णपणे सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या शहर आणीबाणीच्या स्थितीतून जात आहे. संकट कधी ओढवेल याचा नेम नाही. नागरिकांनी किमान पहिला डोस तरी घेऊन ठेवावा. संसर्ग झाला तरी जीव वाचेल, असेही पाण्डेय ायांनी नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद