शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:40 IST

लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा

ठळक मुद्देपर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत.

औरंगाबाद : पर्यटन स्थळांच्या परिसरात काम करून पर्यटनाद्वारे रोजीरोटी भागविणारे हजारो लोक  अजिंठा-वेरूळ परिसरात आहेत. आठ महिन्यांपासून या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या हजारो दीनदुबळ्यांचा विचार करून आणि कोरोनाच्या दृष्टीने संरक्षक अटी घालून पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यटन स्थळांवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आंदोलनाकडे वळतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये, असा इशाराही महानोर यांनी शुक्रवार, दि. २० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदनात महानोर म्हणाले की, भारताचे वैभव असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्याच्या परिसरात मी राहत असून, महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांशी माझे दृढ नाते आहे. ही सर्व पर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना आता कोणताही  रोजगार राहिलेला नाही. हातावर पोट असल्याने अन्य  कोणताही व्यवसाय या लोकांना ठाऊक नाही, तसेच या लोकांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. उपाशी, अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव असून, याचा विचार करून पर्यटन स्थळे सुरू करावीत. अजिंठा गाईड असोसिएशन फॉर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष शेख अबरार यांच्याकडे महानोर यांनी निवेदनाची प्रत सुपूर्त केली. या लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा, असेही महानोर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद