शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:40 IST

लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा

ठळक मुद्देपर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत.

औरंगाबाद : पर्यटन स्थळांच्या परिसरात काम करून पर्यटनाद्वारे रोजीरोटी भागविणारे हजारो लोक  अजिंठा-वेरूळ परिसरात आहेत. आठ महिन्यांपासून या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या हजारो दीनदुबळ्यांचा विचार करून आणि कोरोनाच्या दृष्टीने संरक्षक अटी घालून पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यटन स्थळांवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आंदोलनाकडे वळतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये, असा इशाराही महानोर यांनी शुक्रवार, दि. २० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदनात महानोर म्हणाले की, भारताचे वैभव असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्याच्या परिसरात मी राहत असून, महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांशी माझे दृढ नाते आहे. ही सर्व पर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना आता कोणताही  रोजगार राहिलेला नाही. हातावर पोट असल्याने अन्य  कोणताही व्यवसाय या लोकांना ठाऊक नाही, तसेच या लोकांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. उपाशी, अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव असून, याचा विचार करून पर्यटन स्थळे सुरू करावीत. अजिंठा गाईड असोसिएशन फॉर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष शेख अबरार यांच्याकडे महानोर यांनी निवेदनाची प्रत सुपूर्त केली. या लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा, असेही महानोर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद