शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:40 IST

लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा

ठळक मुद्देपर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत.

औरंगाबाद : पर्यटन स्थळांच्या परिसरात काम करून पर्यटनाद्वारे रोजीरोटी भागविणारे हजारो लोक  अजिंठा-वेरूळ परिसरात आहेत. आठ महिन्यांपासून या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या हजारो दीनदुबळ्यांचा विचार करून आणि कोरोनाच्या दृष्टीने संरक्षक अटी घालून पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यटन स्थळांवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आंदोलनाकडे वळतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये, असा इशाराही महानोर यांनी शुक्रवार, दि. २० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदनात महानोर म्हणाले की, भारताचे वैभव असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्याच्या परिसरात मी राहत असून, महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांशी माझे दृढ नाते आहे. ही सर्व पर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना आता कोणताही  रोजगार राहिलेला नाही. हातावर पोट असल्याने अन्य  कोणताही व्यवसाय या लोकांना ठाऊक नाही, तसेच या लोकांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. उपाशी, अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव असून, याचा विचार करून पर्यटन स्थळे सुरू करावीत. अजिंठा गाईड असोसिएशन फॉर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष शेख अबरार यांच्याकडे महानोर यांनी निवेदनाची प्रत सुपूर्त केली. या लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा, असेही महानोर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद