शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

मद्य उद्योगांची आणखी पाणी कपात होणार

By admin | Updated: April 22, 2016 00:53 IST

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी,

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी, असे साकडे उद्योजक संघटनांनी आज जिल्हा प्रशासनाला घातले. उद्योजक आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या उपस्थितीत झाल्या. उद्योजकांनी दोन प्रस्ताव या बैठकीत सादर केले. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट शुक्रवारी शहरात आल्यानंतर याप्रकरणी निर्णय होईल. सध्या मद्य उद्योगांची २० टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे, तर १० इतर उद्योगांची पाणी कपात करण्यात आलेली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय होईल. त्यानंतर शुक्रवारी कोर्टासमोर प्रशासन बाजू मांडेल, असे जिल्हाधिकारी डॉ. पांडे यांनी सांगितले. प्रशासनाने कपातीप्रकरणी अंतिम निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळे प्रस्ताव समोर आले आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. उद्योजकांनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, २४ एप्रिलपासून ५ टक्के, ८ मे पासून ५ टक्के त्यात भर टाकावी. २३ मे पासून ५ टक्के भर टाकावी, अशी १५ टक्के कपात टप्प्याटप्प्याने करावी. या प्रस्तावानुसार जर विचार झाला तर उद्योगही टिकतील आणि पाण्याची बचतही होईल. उद्योग टिकले नाही तर त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतील. मद्य उद्योग हे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी निगडित आहेत. ते पाण्याअभावी बंद पडले तर त्याचा जगभर वाईट संदेश जाईल. त्यामुळे मध्यम तोडगा निघावा, असे मत सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, म.वि.मंडळ सदस्य मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक, मुनीष शर्मा, मद्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. ४० दिवस बांधकामे बंदऔद्योगिक वसाहतीतील बांधकामे ४० दिवसांसाठी बंद ठेवली तर त्याचा फायदा होईल. पाणी बचतीसाठी प्रशासन अनेक पर्यायांचा विचार करीत आहे. मद्य उद्योगांसाठी २० टक्के कपात झाली आहे. इतर उद्योगांसाठी १० टक्के पाणी कपात केली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात १० टक्के पाणी कपात केली होती, ती देखील कायम आहे. शक्यता पडताळून निर्णय होईल. मद्य उद्योगांचे पाणी आणखी कपात करण्याबाबत प्रशासनाचा विचार आहे, असे जिल्हाधिकारी निधी पांडे म्हणाल्या.