शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मद्य उद्योगांची आणखी पाणी कपात होणार

By admin | Updated: April 22, 2016 00:53 IST

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी,

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी, असे साकडे उद्योजक संघटनांनी आज जिल्हा प्रशासनाला घातले. उद्योजक आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या उपस्थितीत झाल्या. उद्योजकांनी दोन प्रस्ताव या बैठकीत सादर केले. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट शुक्रवारी शहरात आल्यानंतर याप्रकरणी निर्णय होईल. सध्या मद्य उद्योगांची २० टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे, तर १० इतर उद्योगांची पाणी कपात करण्यात आलेली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय होईल. त्यानंतर शुक्रवारी कोर्टासमोर प्रशासन बाजू मांडेल, असे जिल्हाधिकारी डॉ. पांडे यांनी सांगितले. प्रशासनाने कपातीप्रकरणी अंतिम निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळे प्रस्ताव समोर आले आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. उद्योजकांनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, २४ एप्रिलपासून ५ टक्के, ८ मे पासून ५ टक्के त्यात भर टाकावी. २३ मे पासून ५ टक्के भर टाकावी, अशी १५ टक्के कपात टप्प्याटप्प्याने करावी. या प्रस्तावानुसार जर विचार झाला तर उद्योगही टिकतील आणि पाण्याची बचतही होईल. उद्योग टिकले नाही तर त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतील. मद्य उद्योग हे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी निगडित आहेत. ते पाण्याअभावी बंद पडले तर त्याचा जगभर वाईट संदेश जाईल. त्यामुळे मध्यम तोडगा निघावा, असे मत सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, म.वि.मंडळ सदस्य मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक, मुनीष शर्मा, मद्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. ४० दिवस बांधकामे बंदऔद्योगिक वसाहतीतील बांधकामे ४० दिवसांसाठी बंद ठेवली तर त्याचा फायदा होईल. पाणी बचतीसाठी प्रशासन अनेक पर्यायांचा विचार करीत आहे. मद्य उद्योगांसाठी २० टक्के कपात झाली आहे. इतर उद्योगांसाठी १० टक्के पाणी कपात केली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात १० टक्के पाणी कपात केली होती, ती देखील कायम आहे. शक्यता पडताळून निर्णय होईल. मद्य उद्योगांचे पाणी आणखी कपात करण्याबाबत प्रशासनाचा विचार आहे, असे जिल्हाधिकारी निधी पांडे म्हणाल्या.