शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मद्य उद्योगांची आणखी पाणी कपात होणार

By admin | Updated: April 22, 2016 00:53 IST

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी,

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे आणखी पाणी कपात होण्याची शक्यता असून, २२ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने कोर्टासमोर मद्य व इतर उद्योगांच्या पाणी कपातीप्रकरणी न्याय्य बाजू मांडावी, असे साकडे उद्योजक संघटनांनी आज जिल्हा प्रशासनाला घातले. उद्योजक आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या उपस्थितीत झाल्या. उद्योजकांनी दोन प्रस्ताव या बैठकीत सादर केले. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट शुक्रवारी शहरात आल्यानंतर याप्रकरणी निर्णय होईल. सध्या मद्य उद्योगांची २० टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे, तर १० इतर उद्योगांची पाणी कपात करण्यात आलेली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय होईल. त्यानंतर शुक्रवारी कोर्टासमोर प्रशासन बाजू मांडेल, असे जिल्हाधिकारी डॉ. पांडे यांनी सांगितले. प्रशासनाने कपातीप्रकरणी अंतिम निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळे प्रस्ताव समोर आले आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. उद्योजकांनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, २४ एप्रिलपासून ५ टक्के, ८ मे पासून ५ टक्के त्यात भर टाकावी. २३ मे पासून ५ टक्के भर टाकावी, अशी १५ टक्के कपात टप्प्याटप्प्याने करावी. या प्रस्तावानुसार जर विचार झाला तर उद्योगही टिकतील आणि पाण्याची बचतही होईल. उद्योग टिकले नाही तर त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतील. मद्य उद्योग हे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी निगडित आहेत. ते पाण्याअभावी बंद पडले तर त्याचा जगभर वाईट संदेश जाईल. त्यामुळे मध्यम तोडगा निघावा, असे मत सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, म.वि.मंडळ सदस्य मुकुंद कुलकर्णी, मिलिंद कंक, मुनीष शर्मा, मद्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. ४० दिवस बांधकामे बंदऔद्योगिक वसाहतीतील बांधकामे ४० दिवसांसाठी बंद ठेवली तर त्याचा फायदा होईल. पाणी बचतीसाठी प्रशासन अनेक पर्यायांचा विचार करीत आहे. मद्य उद्योगांसाठी २० टक्के कपात झाली आहे. इतर उद्योगांसाठी १० टक्के पाणी कपात केली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात १० टक्के पाणी कपात केली होती, ती देखील कायम आहे. शक्यता पडताळून निर्णय होईल. मद्य उद्योगांचे पाणी आणखी कपात करण्याबाबत प्रशासनाचा विचार आहे, असे जिल्हाधिकारी निधी पांडे म्हणाल्या.