शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

साताबारा कोरा नसल्याने पुनर्गठण झाले कमी

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

शिरीष शिंदे , बीड दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याठी राज्य शासनाने पीक कर्ज पुनर्गठणचा पर्याय खुला केला होता. मात्र यासाठी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेले

शिरीष शिंदे , बीडदुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याठी राज्य शासनाने पीक कर्ज पुनर्गठणचा पर्याय खुला केला होता. मात्र यासाठी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरीच पात्र असल्याचा आदेश असल्याने जिल्ह्यातील केवळ ८ हजार ७१५ शेकतऱ्यांनी पीक कर्ज पुनर्गठण केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नसल्याने त्यांना याचा लाभ घेता आला नाही. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थीक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने कर्ज पुनर्गठणचा अध्यादेश काढला होता. ज्या शेतकऱ्यांनी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतले होते मात्र मार्च पर्यंत परतफेड केली नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे रुपांतर करण्याच्या सुचना बँकाना मिळाल्या होत्या. जिल्ह्यात पाच लाखाच्या जवळपास शेतकरी सभासद आहेत.चार लाखापर्यंत शेतकरी खरिपाचे पीक घेतात. गेल्या तीन वर्षापासून पडलेल्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत. या शेतकऱ्यांना नव्याने सातबारा कोरा करणे गरजेचे होते. त्यानंतरच नव्याने कर्ज मिळणे शक्य होते.याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, २०१४-१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली, ठराविक कालावधीत कर्जाच परतफेड करता आली नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा उल्लेख अध्यादेशात करण्यात आला होता. त्यामुळे २०१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठणचा लाभ मिळाला. मुळात दुष्काळी परिस्थितीमुळे जुन्या शेतकऱ्यांना पीक कर्ज जिल्ह्यातील ८ हजार ७१५ शेकतऱ्यांनी पीक कर्ज पुनर्गठण केले आहे. पीक कर्ज पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांच्या पहिल्या वर्षाचे व्याज सरकार भरणार आहे. दुसऱ्या वर्षाचे ६ टक्के व्याजही सरकार भरील तर उर्वरीत ६ टक्के व्याज शेतकऱ्यास भरावयाचे आहे. पुढील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वर्षाचे व्याज शेतकऱ्यांना भरायचे असल्याचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे यांनी सांगितले. दरम्यान, पीक कर्ज पुनर्गठणासाठी बँकाचा व्याजदर ११ ते १२ टक्यांच्या जवळपास असेल. प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगाळा असल्याने यात थोडाफार फरक राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज पुनर्गठणाची माहिती नसल्याकारणाने प्रस्ताव दाखल करणाऱ्यांची संख्या कमी आहे. मुळात दुष्काळजन्य परिस्थिती तीन वर्षापासून असल्याने पुनर्गठण हे २०१२-१३ पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असायला हवा होता मात्र तसे न करता हा नियम राज्य सरकाने केवळ २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच लागु केला होता. तसेच अध्यादेशात जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा कोठेच उल्लेख नव्हाता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. बँकेत चकरा मारुनही पीक कर्ज मिळण्यास असंख्य अडचणींचा समाना करावा लागतो. त्यातच पुनर्गठणाची प्रक्रीयाही काहीशी किचकट होती. अशा विविध कारणामुळे पीक कर्ज पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकली नसल्याची चर्चा होत आहे.