शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

साताबारा कोरा नसल्याने पुनर्गठण झाले कमी

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

शिरीष शिंदे , बीड दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याठी राज्य शासनाने पीक कर्ज पुनर्गठणचा पर्याय खुला केला होता. मात्र यासाठी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेले

शिरीष शिंदे , बीडदुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याठी राज्य शासनाने पीक कर्ज पुनर्गठणचा पर्याय खुला केला होता. मात्र यासाठी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरीच पात्र असल्याचा आदेश असल्याने जिल्ह्यातील केवळ ८ हजार ७१५ शेकतऱ्यांनी पीक कर्ज पुनर्गठण केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नसल्याने त्यांना याचा लाभ घेता आला नाही. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थीक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने कर्ज पुनर्गठणचा अध्यादेश काढला होता. ज्या शेतकऱ्यांनी २०१४ मध्ये पीक कर्ज घेतले होते मात्र मार्च पर्यंत परतफेड केली नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे रुपांतर करण्याच्या सुचना बँकाना मिळाल्या होत्या. जिल्ह्यात पाच लाखाच्या जवळपास शेतकरी सभासद आहेत.चार लाखापर्यंत शेतकरी खरिपाचे पीक घेतात. गेल्या तीन वर्षापासून पडलेल्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत. या शेतकऱ्यांना नव्याने सातबारा कोरा करणे गरजेचे होते. त्यानंतरच नव्याने कर्ज मिळणे शक्य होते.याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, २०१४-१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली, ठराविक कालावधीत कर्जाच परतफेड करता आली नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा उल्लेख अध्यादेशात करण्यात आला होता. त्यामुळे २०१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठणचा लाभ मिळाला. मुळात दुष्काळी परिस्थितीमुळे जुन्या शेतकऱ्यांना पीक कर्ज जिल्ह्यातील ८ हजार ७१५ शेकतऱ्यांनी पीक कर्ज पुनर्गठण केले आहे. पीक कर्ज पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांच्या पहिल्या वर्षाचे व्याज सरकार भरणार आहे. दुसऱ्या वर्षाचे ६ टक्के व्याजही सरकार भरील तर उर्वरीत ६ टक्के व्याज शेतकऱ्यास भरावयाचे आहे. पुढील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वर्षाचे व्याज शेतकऱ्यांना भरायचे असल्याचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे यांनी सांगितले. दरम्यान, पीक कर्ज पुनर्गठणासाठी बँकाचा व्याजदर ११ ते १२ टक्यांच्या जवळपास असेल. प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगाळा असल्याने यात थोडाफार फरक राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज पुनर्गठणाची माहिती नसल्याकारणाने प्रस्ताव दाखल करणाऱ्यांची संख्या कमी आहे. मुळात दुष्काळजन्य परिस्थिती तीन वर्षापासून असल्याने पुनर्गठण हे २०१२-१३ पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असायला हवा होता मात्र तसे न करता हा नियम राज्य सरकाने केवळ २०१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच लागु केला होता. तसेच अध्यादेशात जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा कोठेच उल्लेख नव्हाता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. बँकेत चकरा मारुनही पीक कर्ज मिळण्यास असंख्य अडचणींचा समाना करावा लागतो. त्यातच पुनर्गठणाची प्रक्रीयाही काहीशी किचकट होती. अशा विविध कारणामुळे पीक कर्ज पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकली नसल्याची चर्चा होत आहे.