शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

आरक्षणात राजकारण नाही..!

By admin | Updated: July 4, 2016 00:12 IST

जालना : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. आरक्षण देताना त्यात राजकारण होणार नाही, आरक्षण कोर्टात रद्द होणार नाही,

जालना : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. आरक्षण देताना त्यात राजकारण होणार नाही, आरक्षण कोर्टात रद्द होणार नाही, याची काळजी घेऊनच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे दिली.धनगर समाज संघर्ष समितीचे राज्याध्याक्ष खा. डॉ. विकास महात्मे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांचा तसेच समाजातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, सुनिताताई महात्मे, निर्मलाताई दानवे, शोभाताई मतकर, माजी आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, कृ ऊबा उपसभापती भास्कर दानवे, धनगर समाज संघर्ष समितीचे राज्यसचिव मोरेश्वर झिले, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, विदर्भ विभागप्रमुख अरूण माहोरे आदी उपस्थिती होते. खा. दानवे म्हणाले, पद्मश्री विकास महात्मे यांचे समाजासाठीे घेतलेले कष्ट, काम करण्याची जिद्द, त्याच्या पाठीशी असलेली समाजाची एकजूट हे सर्व पाहून त्यांना राज्यसभेत समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी भाजपाने दिली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. हे आरक्षण आजच भाजपा सरकार देवू शकते. मात्र, ते दिल्यास आरक्षण ५० टक्क्यांवर जाईल. शिवाय न्यायालयात हा ते टिकणार नाही. म्हणून आरक्षणात कुठलेही राजकारण ठेवले जाणार नाही. ते न्यायालयात टिकले पाहिजे, या बाजूने अभ्यास करूनच धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगून खा. दानवे म्हणाले, भाजपा हा जातीयवादी पक्ष असल्याच्या बावड्या उठवून पक्षाला बदनाम करण्यात येत आहे. मात्र, जे भाजपाला जातीयवादी म्हणतात त्यांनीच भाजपाच्या पक्तींत आपले हात धूवून घेतलेले आहेत.आ. अर्जुन खोतकर म्हणाले की, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळाले आहे. धनगर समाजाचे शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित समाजबांधवांना यावेळी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष देडगे, सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष कपिल दहेकर, भास्कर माथले, दत्ता खोमणे, सुंदर मुळे, ज्ञानेश्वर कडेवार, विठ्ठल सातपुते, ज्ञानदेव मापारे, सुनील कानडे, मच्छिंद्र होळकर, विजय मतकर, शंकर सपकाळ, राजेंद्र साखरे, परमेश्वर सोमवारे, भगवान पाटोळे, सुरेश दिवटे अंबादास हातकडके, सुरेश दिवटे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक दहेकर यांनी केले, तर आभार अ‍ॅड. सुरेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)भाजपा सरकारमुळे धनगर समाजाला ६५ वर्षांनंतर राज्यसभेत जाण्याची प्रथमच संधी मिळाली. याचा आनंद असतानाच दुसरीकडे दु:खही आहे. आतापर्यंत संधी का मिळाली नाही. याचे चिंतन समाजाने करावे. समाजाच्या एकजुटीमुळेच ही संधी मिळाली आहे. त्यासाठी भाजपा नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा सिंहाचा वाटा आहे. ४त्यांच्यामुळेच आपण राज्यसभेवर गेलो असून, समाजाचा पहिला खासदार म्हणून मान मिळाला आहे. तेव्हा जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत जाहीर सत्कार समारंभात सत्कार स्वीकारणार नसल्याचे खा. विकास महात्मे यांनी सांगत आपण आरक्षण घेणारच आहोत. त्यासाठी समाज बाधवांनी एकाजुटीने राहिले पाहिजे, असे आवाहनही डॉ. विकास महात्मे यांनी केले.