शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संविधानाला कुठलाही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:52 IST

कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘या देशाच्या संविधानाला कुठलाही धोका नाही. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर हे संविधान आधारलेले आहे. ही पायाभरणी इतकी भक्कम आहे की, कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.ते दुपारी तापडिया नाट्यमंदिरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर डे सेलिब्रेशन’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील होते. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई- गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. व्ही.डी. साळुंके, ज्येष्ठ विधिज्ञ नानासाहेब शिंदे, अ‍ॅड. प्रल्हाद खंडागळे पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. एस.आर. बोदडे यांनी प्रास्ताविक केले. ५ जुलै १९२३ रोजी बाबासाहेबांनी वकिली सुरू केली, तो दिवस गेल्या पाच वर्षांपासून आपण ‘लॉयर डे’ म्हणून साजरा करीत आहोत, असे बोदडे यांनी सांगितले.मराठा मोर्चे संघ पुरस्कृतअलीकडेच निघालेले मराठा मोर्चे हे राष्टÑीय स्वयंसेवक संघाने आयोजित केले होते, असा सनसनाटी आरोप करून कोळसे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. मराठ्यांच्या जीवनात एवढ्या चांगल्या गोष्टी कधी घडत नाहीत, अशी टिपणीही त्यांनी केली. संभाजी महाराजांना जाळायला महारांनी जागा दिली होती. त्यावरून तुमचं आमचं नातं काय हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.बाबासाहेबांचे मोठे योगदानन्या. व्ही.एल. आचलिया यांनी सांगितले की, भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक गुलामगिरीतून या देशाला मुक्त करण्याचे त्यांनी केलेले कार्यही अविस्मरणीय आहे. मीसुद्धा एका शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत आलो. यामागे बाबासाहेबांचीच प्रेरणा आहे. आजच्या दिनी आपण बाबासाहेबांच्या मार्गाने जात आहोत की नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.सुदैव आणि दुर्दैवडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्माला आले, हे या देशाचे सुदैव होय, तर बाहेरच्या देशांना ते कळले; पण आपल्या देशाला ते अद्यापही समजले नाहीत, हे दुर्दैव होय, अशी खंत भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. या देशाने मानसिक आणि भावनिक पातळीवर स्वीकारलेले नाही. कारण या देशाच्या मनातून जातीचा शूद्र विचार यत्किंचितही गेलेला नाही, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.