शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी अ‍ॅक्शन प्लॅनच नाही

By admin | Updated: September 10, 2015 00:32 IST

लातूर / रेणापूर: दुष्काळामुळे दर तीन तासाला आपल्या राज्यातील एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र त्यावर शासन गंभीर नाही.

लातूर / रेणापूर: दुष्काळामुळे दर तीन तासाला आपल्या राज्यातील एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र त्यावर शासन गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठण केले नाही. दुष्काळ निवारणासाठी शासनाकडे कसलाही अ‍ॅक्शन प्लॅनच नाही, असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.लातूर जिल्ह्यातील दुष्काळ इटी, नागापूर, पळशी, खानापूर शिवारातील पीक परिस्थितीची पाहणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केली. दरम्यान, रेणापुरात दुष्काळ परिषद व काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. लातूर येथे पत्रकारांशी वार्तालापही त्यांनी केला.राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पाऊस नसल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शासन मात्र उपाययोजना करीत नाही. लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री दोनदा येऊन गेले. परंतु, फायदा काहीच झाला नाही. विधानसभेत काँग्रेस पक्षाने तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली. परंतु, त्यावर शासनाने कर्जमाफी देणार नाही, कर्जाचे पुनर्गठण करू, अशी घोषणा केली. परंतु, अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठण केले नाही. त्यामुळे व्याजाचा भुर्दंड वाढतच आहे. मजुरांच्या हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही, अशा परिस्थिती शासन बेफिकीर आहे. झोपेचे सोंग केलेल्या या शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरं-ढोरं सोबत घेऊन आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे. गावातून मजूर शहरात स्थलांतरीत होत आहेत. तर शहरात शिक्षणाला असलेली मुलं खर्च परवडत नसल्यामुळे महाविद्यालयातून स्थलांतरीत होत आहेत. कर्जमाफी नाही. शिक्षण शुल्काच्या माफीत स्पष्टता नाही. व्यावसायिक कॉलेजमधील शैक्षणिक शुल्क शेतकऱ्यांच्या मुलांना परवडणारे नाही, यावर शासन कधी निर्णय घेणार असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला. प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली असून, या यंत्रणेच्या पाठीमागे शासन खंबीर उभे नाही. त्यामुळे रोहयोची कामेही अल्प प्रमाणात सुरू आहेत. गोवंश हत्याबंदीचा कायदा शासनाने आणला, त्यावेळी भाकड जनावरे सांभाळण्याची शंभर टक्के जबाबदारी आम्ही घेऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु, आज चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी शासन घेत नाही. त्यामुळेच चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमभंगातून होत असल्याचा जावई शोध शासन लावत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कामच या शासनाकडून होत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. वेळप्रसंगी कर्ज काढू, तिजोरी रिकामी करू, अशा मोठ मोठ्या घोषणा मुख्यमंत्री करीत आहेत. परंतु, निर्णय काहीच नाहीत. या शासनाला गांभीर्यच राहिले नाही, असेही विखे-पाटील यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला आमदार अमित देशमुख, आमदार त्रिंबक भिसे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)दुष्काळाला शरद पवारच जबाबदार आहेत, असे विधान बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले, हे त्यांचे व्यक्तिगत मत असून, या मताशी आपण सहमत नाही. बाळासाहेब विखे-पाटील व शरद पवार हे दोन मोठे नेते आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो, असेही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.४शिवाय, पाण्याचे समतोल वाटप झाले पाहिजे. मराठवाड्याला पाणी देण्यास आपला विरोध नाही. त्यासाठी नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील नेत्यांची बैठक झाली पाहिजे.महानगरपालिकेतही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. कायमस्वरुपी व तात्काळ पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मनपाने पाठवावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. लातूर शहरात पाण्याची गंभीर समस्या आहे. उजनी धरणातून पाणी आणण्याची सूचना आमदार अमित देशमुख यांची आहे. ती योग्य असून, त्यासाठीचा प्रस्ताव मनपाने तात्काळ पाठवावा, त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.४शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा नसल्यामुळे ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता तात्काळ आणि कायमस्वरुपी असे दोन प्रस्ताव पाठवावेत, असेही ते म्हणाले.