शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

हक्काच्या पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र करण्याची गरज

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

उस्मानाबाद : सद्यस्थितीत गरजेपेक्षा अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध असून, याचे समन्यायी वाटप होणे गरजेचे

उस्मानाबाद : सद्यस्थितीत गरजेपेक्षा अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध असून, याचे समन्यायी वाटप होणे गरजेचे असे सांगतानाच मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळविण्यासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी लोकचळवळ उभी करून संघर्ष तीव्र करण्याची गरज मराठवाडा पाणी हक्क समितीच्या बैठकीत अनेकांनी बोलून दाखविली.तालुक्यातील उपळे (मा) येथे शनिवारी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड होते. यावेळी प्रमुख वक्ते जलतज्ज्ञ डॉ. प्रदीप पुरंदरे, अण्णासाहेब खंदारे, सुभेदार बन] डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे, आदी उपस्थित होते. प्रारंभी संयोजन प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी बैठक आयोजनामागील उद्देश सांगितला. पाणी प्रश्न आणि समितीची भूमिका विषद करताना प्रा. डॉ. प्रदीप पुरंदरे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्यापूर्वी त्याच्या विविध बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटप, जलसंधारण, पाणी वापर संस्था, धरणांचे मुल्यमापन आणि लोकचळवळ या अंगाने जावे लागेल. आज मराठवाड्यात केवळ २०९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गोदावरी पाणी वाटप लवादाने पाणी दिलेल्या मान्यतेपेक्षा ९१ टक्के पाणी अडविले आहे. तरीही मराठवाड्यात पन्नास टक्के पाण्याची तूट आहे. त्यातच नगर, नाशिककरांनीही ८० टीएमसी अतिरिक्त पाणी अडविल्याने जायकवाडीत पाणी येणे कमी झाले आहे. तीच अवस्था कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचीही आहे. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे ६२ टीएमसी पाणी असताना केवळ २५ टीएमसी पाणी मंजूर केले. त्यातील सात टीएमसीची कामे सुरू केली. मात्र, पर्यावरणाचा परवाना घेतला नसल्यानेही तीही बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्व भागांना समन्यायी पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण अधिनियम हा कायदा २००५ मध्ये केला. मात्र, त्याचे नियमन बनविले नसल्याने आज तो निरूपयोगी ठरत आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात जनतेनेच आपल्या भागात पडणारे पावसाचे पाणी तेथेच अडवून जिरविले पाहिजे व शासनावर समन्यायी पाणी वाटपासाठी लोकचळवळीतून दबाव वाढविला पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून संघर्ष निर्माण करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांना जागृत करण्याचे आवाहनही पुरंदरे यांनी केले. अण्णासाहेब खंदारे यांनी उस्मानाबादला मिळणाऱ्या २५ टीएमसी पाण्यासाठी न्यायालयाद्वारे व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात पांडुरंग आवाड यांनी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन कसे करावे, याची माहिती दिली. अरविंद गोरे, अनंत आडसूळ, नेताजी गरड, बशारत अहमद, प्रा. अर्जुन जाधव, शिवाजी सरडे, शहाजी पाटील, प्रा. नितीन पाटील, कोंडाप्पा कोरे यांनीही यावेळी काही सूचना मांडल्या. प्रा. जाधव व मुख्याध्यापक गवाड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)