शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाला चपलांचा हार घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : स्थानिक नोंदीत शेतकऱ्यांचा ऊस न घेता बीड जिल्ह्यातील साखर कारखाने परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत आहेत. यामुळे ...

औरंगाबाद : स्थानिक नोंदीत शेतकऱ्यांचा ऊस न घेता बीड जिल्ह्यातील साखर कारखाने परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. उसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे भाव मिळावा, या अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी क्रांतीचौकातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे पाटील यांनी येथे दिला.

क्रांतीचौक येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात गुरुवारी माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सांगण्यात आले की, ५ जानेवारी रोजी कार्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) योगिराज सुर्वे, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी व शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष गंगाभीषण थावरे पाटील यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील ऊस खरेदी करावा, तसेच पश्चिम महाराष्ट्रतील साखर कारखान्याप्रमाणे उसाला दर देण्यात यावा व एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम देण्यात यावी, को-२६५ जातीचा ऊस हा मान्यताप्राप्त असल्यामुळे त्याची नोंद घेण्यात यावी, असे आदेश कारखान्याच्या प्रतिनिधीला बैठकीत दिले होते; पण आजपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी कारखान्यांनी केली नाही. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास २६ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील शेतकरी औरंगाबादमध्ये दाखल होतील व ध्वजारोहण झाल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

चौकट

शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या

ऊस नोंदीनुसार तोडणीसाठी ऑनलाइन स्लिप निघत नसेल, तर अशा परिस्थितीत कारखान्यांनी ऑफलाइन स्लिप द्यावी.

कारखान्याकडून ऊस उतारा कमी दर्शविला जातो. यासाठी समिती नेमण्यात यावी.

ऊस गाळपाला आल्यानंतर एफआरपीची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावी.