शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

...तर लॉकडाऊनची ऑर्डर १० मिनिटांत निघेल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 11:59 IST

Collector Warns citizens about Lockdown in Aurangabad रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला, कोरोनाची शिस्त नागरिकांनी पाळली नाही तर येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही

ठळक मुद्देरुग्णवाढीत औरंगाबादचा क्रमांक वरचा  आरोग्य सुविधांवर पडतोय प्रचंड ताण

औरंगाबाद : ‘लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. १० मिनिटांत ऑर्डर निघेल; परंतु सामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी अंशत: लॉकडाऊन केले आहे. त्यातही नागरिक शिस्त पाळत नसतील, तर मग पर्याय नाही,’ असा गर्भित इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी दिला. नागरिकांनी सहकार्य करावे, शासनाने लागू केलेले सर्व नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्रतेने उसळी घेत आहे. जनसामान्यांच्या रोजीरोटीवर गदा येऊ नये, म्हणून थेट लॉकडाऊनऐवजी अंशत: लॉकडाऊन केले आहे. परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला, कोरोनाची शिस्त नागरिकांनी पाळली नाही तर येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, यावर त्यांनी जोर दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले, अंत्ययात्रांना गर्दी करू नये, फक्त २० नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आदेश असताना गाढेजळगांव परिसरात ५०० हून अधिक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी होते. करमाड पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी विवाह सोहळे होत असल्याची माहिती आली आहे. त्याबाबत शहानिशा करून गुन्हे दाखल करण्यात येतील. गर्दी करून कार्यक्रम घ्यायचे आणि पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यावर प्रशासनावर खापर फोडायचे ही पद्धत योग्य नाही. शहरात काही भागांमध्ये कोरोनाची शिस्त पाळली जात नाही. काही लोकप्रतिनिधी पोलिसांशी हुज्जत घालतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा जल्लोष करण्यात आला. हे सगळे ज्यांनी केले, त्यांनीदेखील भान ठेवणे गरजेचे होते. या सगळ्या घटना आपणास लॉकडाऊनकडे घेऊन जात असल्याचे सांगत नांदेड, परभणीमध्ये लॉकडाऊन झाले आहे. औरंगाबादचा रुग्णवाढीत क्रमांक वरचा आला आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

घाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी प्रयत्नघाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी तयारी केली आहे. ४६ आयसीयूचे बेड्स वाढतील. यासाठी बुधवारी दिवसभर बैठकांचे सत्र झाले. घाटीत सर्व काही तयार आहे, त्यामुळे तेथे बेड्स वाढविणे सोपे जाणार आहे. बरीचशी व्यवस्था केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या