शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर अर्थशास्त्रातील ‘नोबेल’चे पहिले मानकरी आंबेडकर ठरले असते; आरबीआयचे उपसंचालक डॉ. गोलाईत यांचा विश्वास

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 15:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली.

छत्रपती संभाजीनगर : जर पन्नासच्या दशकात अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक सुरू झाले असते, तर सर्वांत पहिले हे पारितोषिक जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे उपसंचालक डॉ. रमेश गोलाईत यांनी व्यक्त केला.

‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’च्या (डामा) पदग्रहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात डॉ. गोलाईत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. रेल्वे स्टेशन रोडलगत भानुदासराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित या समारंभाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी या फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. एम.डी. गायकवाड होते.

यावेळी डॉ. गोलाईत म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे असामान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताचे शिल्पकार होते. मात्र, आपण त्यांना घटनेचे शिल्पकार, समाजोद्धारक आणि अन्य काही उपाधी देऊन सीमित केले. ते थोर अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या आपल्या प्रबंधातून मांडलेले विचार आजही सुसंगत ठरत आहेत. या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. महिला सक्षमीकरणासाठी आज विविध योजना, कायदे, निर्णय घेतले जातात. हा विचारही बाबासाहेबांनी तेव्हाच मांडला होता. यावेळी आरोग्य उपसंचालक डाॅ. रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक या फाउण्डेशनचे सचिव डॉ. विशाल वाठोरे यांनी केले.

५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा संकल्पअध्यक्षीय समारोपात डॉ. एम.डी. गायकवाड म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएन’ने आता वैद्यकीय शिक्षणासोबत हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर, विविध आजारतज्ज्ञ, शिवाय ॲलोपॅथीसह अन्य विविध पॅथींचे डॉक्टर यांच्यासाठी ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’ (डामा) ही एक साखळी तयार केली आहे. या माध्यमातून शहरात लवकरच ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या आंबेडकरी डॉक्टरांसाठी याठिकाणी आरोग्य सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. गरीब रुग्णांसाठी माफक दरात दर्जेदार सेवा दिली जाणार आहे.