शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

...तर अर्थशास्त्रातील ‘नोबेल’चे पहिले मानकरी आंबेडकर ठरले असते; आरबीआयचे उपसंचालक डॉ. गोलाईत यांचा विश्वास

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 15:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली.

छत्रपती संभाजीनगर : जर पन्नासच्या दशकात अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक सुरू झाले असते, तर सर्वांत पहिले हे पारितोषिक जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे उपसंचालक डॉ. रमेश गोलाईत यांनी व्यक्त केला.

‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’च्या (डामा) पदग्रहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात डॉ. गोलाईत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. रेल्वे स्टेशन रोडलगत भानुदासराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित या समारंभाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी या फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. एम.डी. गायकवाड होते.

यावेळी डॉ. गोलाईत म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे असामान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताचे शिल्पकार होते. मात्र, आपण त्यांना घटनेचे शिल्पकार, समाजोद्धारक आणि अन्य काही उपाधी देऊन सीमित केले. ते थोर अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या आपल्या प्रबंधातून मांडलेले विचार आजही सुसंगत ठरत आहेत. या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. महिला सक्षमीकरणासाठी आज विविध योजना, कायदे, निर्णय घेतले जातात. हा विचारही बाबासाहेबांनी तेव्हाच मांडला होता. यावेळी आरोग्य उपसंचालक डाॅ. रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक या फाउण्डेशनचे सचिव डॉ. विशाल वाठोरे यांनी केले.

५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा संकल्पअध्यक्षीय समारोपात डॉ. एम.डी. गायकवाड म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएन’ने आता वैद्यकीय शिक्षणासोबत हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर, विविध आजारतज्ज्ञ, शिवाय ॲलोपॅथीसह अन्य विविध पॅथींचे डॉक्टर यांच्यासाठी ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’ (डामा) ही एक साखळी तयार केली आहे. या माध्यमातून शहरात लवकरच ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या आंबेडकरी डॉक्टरांसाठी याठिकाणी आरोग्य सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. गरीब रुग्णांसाठी माफक दरात दर्जेदार सेवा दिली जाणार आहे.