शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

...तर अर्थशास्त्रातील ‘नोबेल’चे पहिले मानकरी आंबेडकर ठरले असते; आरबीआयचे उपसंचालक डॉ. गोलाईत यांचा विश्वास

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 15:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली.

छत्रपती संभाजीनगर : जर पन्नासच्या दशकात अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक सुरू झाले असते, तर सर्वांत पहिले हे पारितोषिक जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे उपसंचालक डॉ. रमेश गोलाईत यांनी व्यक्त केला.

‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’च्या (डामा) पदग्रहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात डॉ. गोलाईत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. रेल्वे स्टेशन रोडलगत भानुदासराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित या समारंभाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी या फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. एम.डी. गायकवाड होते.

यावेळी डॉ. गोलाईत म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे असामान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताचे शिल्पकार होते. मात्र, आपण त्यांना घटनेचे शिल्पकार, समाजोद्धारक आणि अन्य काही उपाधी देऊन सीमित केले. ते थोर अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या आपल्या प्रबंधातून मांडलेले विचार आजही सुसंगत ठरत आहेत. या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. महिला सक्षमीकरणासाठी आज विविध योजना, कायदे, निर्णय घेतले जातात. हा विचारही बाबासाहेबांनी तेव्हाच मांडला होता. यावेळी आरोग्य उपसंचालक डाॅ. रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक या फाउण्डेशनचे सचिव डॉ. विशाल वाठोरे यांनी केले.

५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा संकल्पअध्यक्षीय समारोपात डॉ. एम.डी. गायकवाड म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएन’ने आता वैद्यकीय शिक्षणासोबत हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर, विविध आजारतज्ज्ञ, शिवाय ॲलोपॅथीसह अन्य विविध पॅथींचे डॉक्टर यांच्यासाठी ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’ (डामा) ही एक साखळी तयार केली आहे. या माध्यमातून शहरात लवकरच ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या आंबेडकरी डॉक्टरांसाठी याठिकाणी आरोग्य सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. गरीब रुग्णांसाठी माफक दरात दर्जेदार सेवा दिली जाणार आहे.