शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 28, 2024 11:35 IST

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल.

छत्रपती संभाजीनगर : नवीन गहू, ज्वारीचे अडत बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असली तरी पुढील महिन्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. दुसरीकडे अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांना पीक कर्जाची रक्कम मिळाली नाही, अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

रब्बीची १०७ टक्के पेरणीपावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला वेग आला होता. छत्रपती सरासरी पेरणी क्षेत्र १३६८३० हेक्टर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी १४६५८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण १०७.३ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

उद्दिष्ट ८११ कोटींचे, वाटप केवळ २५० कोटीरब्बी हंगामात बँकांना ११६००० शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापैकी फक्त २६ हजार शेतकऱ्यांना २५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. ६१ टक्केच उद्दिष्ट बँकांना पूर्ण करण्यात यश आले.

कोणत्या बँकेला किती उद्दिष्ट देण्यात आले होते.बँक             सभासद कर्जराष्ट्रीयीकृत बँका ४०८०० ३२७ कोटीखाजगी बँका ११८०० ८४ कोटीजिल्हा बँक ५०००० २९७ कोटीग्रामीण बँक १३४००            १०३ कोटी

कोणत्या बँकांनी प्रत्यक्षात किती पीककर्ज वाटप केलेबँक सभासद कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँक १६००० १३७ कोटीखाजगी बँक १४७२ ४७ कोटीजिल्हा बँक : ५००० २१ कोटीग्रामीण बँक : १२२१ १२ कोटी

त्यामुळे नवीन पीक कर्ज वाटप कमीआतापर्यंत १.७८ लाख शेतकऱ्यांनी १९०० कोटी रुपयांची पीककर्जाची परतफेड केली नाही. यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. वार्षिक आधारावर केवळ ५ ते ८ टक्के शेतकरी आहेत जे पीक कर्जासाठी अर्ज करतात. जोपर्यंत विद्यमान शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांना अशक्य आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrop Loanपीक कर्ज