शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम संपत आला; पीककर्ज कधी मिळणार ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 28, 2024 11:35 IST

रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल.

छत्रपती संभाजीनगर : नवीन गहू, ज्वारीचे अडत बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीला आवक कमी असली तरी पुढील महिन्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. रब्बी हंगाम संपत असून, बळीराजा एक ते दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाच्या तयारीला लागेल. दुसरीकडे अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांना पीक कर्जाची रक्कम मिळाली नाही, अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.

रब्बीची १०७ टक्के पेरणीपावसाळ्यातील शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला वेग आला होता. छत्रपती सरासरी पेरणी क्षेत्र १३६८३० हेक्टर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष पेरणी १४६५८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण १०७.३ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

उद्दिष्ट ८११ कोटींचे, वाटप केवळ २५० कोटीरब्बी हंगामात बँकांना ११६००० शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापैकी फक्त २६ हजार शेतकऱ्यांना २५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. ६१ टक्केच उद्दिष्ट बँकांना पूर्ण करण्यात यश आले.

कोणत्या बँकेला किती उद्दिष्ट देण्यात आले होते.बँक             सभासद कर्जराष्ट्रीयीकृत बँका ४०८०० ३२७ कोटीखाजगी बँका ११८०० ८४ कोटीजिल्हा बँक ५०००० २९७ कोटीग्रामीण बँक १३४००            १०३ कोटी

कोणत्या बँकांनी प्रत्यक्षात किती पीककर्ज वाटप केलेबँक सभासद कर्जवाटपराष्ट्रीयीकृत बँक १६००० १३७ कोटीखाजगी बँक १४७२ ४७ कोटीजिल्हा बँक : ५००० २१ कोटीग्रामीण बँक : १२२१ १२ कोटी

त्यामुळे नवीन पीक कर्ज वाटप कमीआतापर्यंत १.७८ लाख शेतकऱ्यांनी १९०० कोटी रुपयांची पीककर्जाची परतफेड केली नाही. यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. वार्षिक आधारावर केवळ ५ ते ८ टक्के शेतकरी आहेत जे पीक कर्जासाठी अर्ज करतात. जोपर्यंत विद्यमान शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांना अशक्य आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrop Loanपीक कर्ज