शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन

By बापू सोळुंके | Updated: July 25, 2024 19:31 IST

सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आमचे नाहीत, त्यामुळे आम्ही विधानसभेत उमेदवार देणार: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर: आंदोलक म्हणून मी आशावादी असल्याने सरकारने मागणी केल्यामुळे पुन्हा एक महिना वेळ दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सत्ताधारीही आमचे नाहीत आणि विरोधक आमचे नाहीत. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार देणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (२५)येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ७ ते १३ ऑगस्टदरम्यान पुन्हा ‘जनसंवाद यात्रा’ काढणार आहे. यासाठी सर्व मराठा समाज लेकरा बाळासह रस्त्यावर यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी समस्त मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगे यांनी त्यांचे उपोषण थांबविले. उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने बुधवारी ते शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. गुरूवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, रक्तातील साखर कमी झाली आणि रक्तदाबही कमी झाला होता. गोरगरीब लोकांना फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसून उत्तर द्यायचे आहे, त्याचीच आता तयारी सुरू केली आहे. रात्री काही उमेदवारांची नावे फायनल केल्याचे ते म्हणाले. १९ ऑगस्ट ला मराठा समाजाचे बैठक बोलावून सगळं जाहीर करणार, आमची बाजू मांडणारा जो कुणी असेल त्यांना निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले. मागच्या दाराने आलेले आ. दरेकर, आ. लाड पत्रकार परिषद घेऊन टीका करत आहेत. त्यांना उत्तर देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.

सरकारचे आवाहन असल्याने उपोषण स्थगितसरकारने थेट आपल्याला आवाहन केले नसले, तरी प्रसिद्धी माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महिने मागितले होते, म्हणून मी त्यांना वेळ दिल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. सलाईन घेऊन पडून राहण्यापेक्षा निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. यामुळे उपोषण मागे घेतल्याचे ते म्हणाले. आता सत्ताधारी आणि विरोधक आमचे नसल्याने थेट गोरगरीब लोकांना मैदानात उतरावं लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

७ ते १३ ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात दुसरा टप्पा७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात होईल. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ही जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. या कालावधीत मोठा पाऊस असला तरी समाजाने रस्त्यावर यावे,असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद