शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन

By बापू सोळुंके | Updated: July 25, 2024 19:31 IST

सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आमचे नाहीत, त्यामुळे आम्ही विधानसभेत उमेदवार देणार: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर: आंदोलक म्हणून मी आशावादी असल्याने सरकारने मागणी केल्यामुळे पुन्हा एक महिना वेळ दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सत्ताधारीही आमचे नाहीत आणि विरोधक आमचे नाहीत. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार देणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (२५)येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ७ ते १३ ऑगस्टदरम्यान पुन्हा ‘जनसंवाद यात्रा’ काढणार आहे. यासाठी सर्व मराठा समाज लेकरा बाळासह रस्त्यावर यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी समस्त मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगे यांनी त्यांचे उपोषण थांबविले. उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने बुधवारी ते शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. गुरूवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, रक्तातील साखर कमी झाली आणि रक्तदाबही कमी झाला होता. गोरगरीब लोकांना फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसून उत्तर द्यायचे आहे, त्याचीच आता तयारी सुरू केली आहे. रात्री काही उमेदवारांची नावे फायनल केल्याचे ते म्हणाले. १९ ऑगस्ट ला मराठा समाजाचे बैठक बोलावून सगळं जाहीर करणार, आमची बाजू मांडणारा जो कुणी असेल त्यांना निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले. मागच्या दाराने आलेले आ. दरेकर, आ. लाड पत्रकार परिषद घेऊन टीका करत आहेत. त्यांना उत्तर देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.

सरकारचे आवाहन असल्याने उपोषण स्थगितसरकारने थेट आपल्याला आवाहन केले नसले, तरी प्रसिद्धी माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महिने मागितले होते, म्हणून मी त्यांना वेळ दिल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. सलाईन घेऊन पडून राहण्यापेक्षा निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. यामुळे उपोषण मागे घेतल्याचे ते म्हणाले. आता सत्ताधारी आणि विरोधक आमचे नसल्याने थेट गोरगरीब लोकांना मैदानात उतरावं लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

७ ते १३ ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात दुसरा टप्पा७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात होईल. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ही जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. या कालावधीत मोठा पाऊस असला तरी समाजाने रस्त्यावर यावे,असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद