शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 18:50 IST

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेण्यात आली

औरंगाबाद : वेरुळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जैन कीर्तीस्तंभ हटवण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

पुरातत्त्व विभागाने वेरुळ लेणीजवळील कीर्तीस्तंभ हटवण्याचे पत्र जैन समाजाला पाठविल्याचे समजल्यानंतर देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी ‘अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे’ राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील, असा कोणताही निर्णय पुरातत्त्व विभागातर्फे केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देऊन यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.जैन समाजाचे राष्ट्र निर्माण कार्यातील असलेले योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असे कार्य होणार नाही. यासंबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक व्हिडीओ संदेशही यावेळी प्रसारित केला.

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कीर्तीस्तंभाची उभारणी व त्याच्या देखभालीसंबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय देशभरातील जैन समाजाच्या प्राचीन तीर्थक्षेत्रासंबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणाऱ्या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याच्या हस्तांतरणासंबंधी येणाऱ्या अडचणी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यासंदर्भात पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळ