शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या भांड्यांचा वाढतोय श्रीमंती थाट; मॉडर्न किचनमध्ये मिळाले मानाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 20:02 IST

कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या मॉडर्न किचनमध्ये मातीचे भांडे ठेवलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता स्टीलनेस स्टील, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक भांड्यांचे वर्षानुवर्षे वापराचे तोटे लक्षात येऊ लागले आहेत. कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या ब्रँडने मातीचे भांडे बाजारात विक्रीला आले आहेत. लाल व काळ्या रंगांतही भांडी विकली जात आहेत.

मातीची भांडी का वापरावीत ?आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी सांगितले की, अनेक विद्यापीठात मातीच्या भांड्यावर संशोधन सुरू आहे. मातीच्या भांड्यांतील पदार्थ शिजवल्यास त्यातील १०० टक्के पोषक तत्त्वे कायम राहतात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक मिळतात. आम्लपित्तांची पातळी वाढत नाही. ॲसिडिटी होत नाही. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. तेलाचा वापरही कमी होतो.

ॲल्युमिनियमची भांडी नकोचॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न वर्षानुवर्षे खाल्ल्याने कर्करोगही होऊ शकतो. पण आता बहुतेक घरांतून ती हद्दपार झाली आहेत. अशा भांड्यातील अन्न खाल्ल्यास ॲसिडिटी, पेप्टिक अल्सर, पोट फुगणे, त्वचेच्या संदर्भातील समस्या उद्भवू शकतात.

मातीची भांडी खाताहेत भावभांडे                         दरवरण-भाताचे भांडे १००० रुतवा ४०० रुपोळी ठेवण्याचा डबा ८५० रुहंडी २१० रु. पासूनपाण्याची बाटली ५४० रु

मातीचा तवा आणि मातीचा माठमातीच्या भांड्यात शिजवलेले भात-वरण अतिशय रुचकर लागतात. मातीचा सुगंध पदार्थांमध्ये उतरतो. यामुळे आता मी मातीच्या भांड्यातच स्वयंपाक करते. याचा सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवत आहे. मातीची भांडे घासण्यासाठी डिटर्जंटची गरज लागत नाही. नारळाच्या शेंड्या किंवा राखेने भांडी घासले जातात. भांड्यांना व्यवस्थित वापरले तर ७ ते ८ वर्ष काहीच होत नाही. फक्त फुटू द्यायचे नाही.- डाॅ. वृषाली देशमुख, गृहिणी

मातीच्या भांड्यांचा वापरआमच्या घरात अनेक वर्षांपासून आम्ही मातीच्या भांड्यांचा वापर करत आहोत. आता त्यात ब्रँंडेड भांडी आली आहेत. वरण, भात करण्यास जास्त वेळ लागत नाही. गॅसवरही भांडी ठेवून स्वयंपाक करता येतो. ही भांडी महाग आहेत, पण त्याने आरोग्याला फायदा मोठा आहे. यांच्या वापराने ॲसिडिटी होत नाही.- सोनाली डोंगरसाने, गृहिणी

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न