शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मातीच्या भांड्यांचा वाढतोय श्रीमंती थाट; मॉडर्न किचनमध्ये मिळाले मानाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 20:02 IST

कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या मॉडर्न किचनमध्ये मातीचे भांडे ठेवलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता स्टीलनेस स्टील, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक भांड्यांचे वर्षानुवर्षे वापराचे तोटे लक्षात येऊ लागले आहेत. कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या ब्रँडने मातीचे भांडे बाजारात विक्रीला आले आहेत. लाल व काळ्या रंगांतही भांडी विकली जात आहेत.

मातीची भांडी का वापरावीत ?आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी सांगितले की, अनेक विद्यापीठात मातीच्या भांड्यावर संशोधन सुरू आहे. मातीच्या भांड्यांतील पदार्थ शिजवल्यास त्यातील १०० टक्के पोषक तत्त्वे कायम राहतात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक मिळतात. आम्लपित्तांची पातळी वाढत नाही. ॲसिडिटी होत नाही. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. तेलाचा वापरही कमी होतो.

ॲल्युमिनियमची भांडी नकोचॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न वर्षानुवर्षे खाल्ल्याने कर्करोगही होऊ शकतो. पण आता बहुतेक घरांतून ती हद्दपार झाली आहेत. अशा भांड्यातील अन्न खाल्ल्यास ॲसिडिटी, पेप्टिक अल्सर, पोट फुगणे, त्वचेच्या संदर्भातील समस्या उद्भवू शकतात.

मातीची भांडी खाताहेत भावभांडे                         दरवरण-भाताचे भांडे १००० रुतवा ४०० रुपोळी ठेवण्याचा डबा ८५० रुहंडी २१० रु. पासूनपाण्याची बाटली ५४० रु

मातीचा तवा आणि मातीचा माठमातीच्या भांड्यात शिजवलेले भात-वरण अतिशय रुचकर लागतात. मातीचा सुगंध पदार्थांमध्ये उतरतो. यामुळे आता मी मातीच्या भांड्यातच स्वयंपाक करते. याचा सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवत आहे. मातीची भांडे घासण्यासाठी डिटर्जंटची गरज लागत नाही. नारळाच्या शेंड्या किंवा राखेने भांडी घासले जातात. भांड्यांना व्यवस्थित वापरले तर ७ ते ८ वर्ष काहीच होत नाही. फक्त फुटू द्यायचे नाही.- डाॅ. वृषाली देशमुख, गृहिणी

मातीच्या भांड्यांचा वापरआमच्या घरात अनेक वर्षांपासून आम्ही मातीच्या भांड्यांचा वापर करत आहोत. आता त्यात ब्रँंडेड भांडी आली आहेत. वरण, भात करण्यास जास्त वेळ लागत नाही. गॅसवरही भांडी ठेवून स्वयंपाक करता येतो. ही भांडी महाग आहेत, पण त्याने आरोग्याला फायदा मोठा आहे. यांच्या वापराने ॲसिडिटी होत नाही.- सोनाली डोंगरसाने, गृहिणी

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न