शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

यंदा पिठाची गिरणी बंद, सायकललाही ब्रेक! छत्रपती संभाजीनगर झेडपी उपकर योजनांना काट

By विजय सरवदे | Updated: June 13, 2024 14:30 IST

योजनांसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांपैकी यंदा समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय लाभार्थ्यांना पिठाची गिरणी, विद्यार्थी- विद्यार्थिनींना सायकल वाटप, घरांवर अच्छादनासाठी लोखंडी पत्रे यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजनांना काट लावण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित योजनांसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

समाज कल्याण विभागामार्फत उपकरातील २० टक्के रकमेतून अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, तसेच ५ टक्के निधीतून दिव्यांगासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, या आर्थिक वर्षात (सन २०२४-२५) मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकल वाटप, मागासवर्गीय शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटार संच, ऑइल इंजिन, पीव्हीसी पाइप, व्यवसायासाठी पिठाची गिरणी, घरावर अच्छादनासाठी लोखंडी पत्रे, स्प्रिंकलर संच, वाहनचालक प्रशिक्षण आदी योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनांकडे डोळे लावून बसलेल्या अनेक लाभार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, यंदा ११९ मागासवर्गीय लाभार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप, ९२ पुरुष व तेवढ्याच महिला लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन, ८६ पशुपालक शेतकऱ्यांना कडबाकुटी यंत्र, शिवणकाम करणाऱ्या ३२२ महिलांना पिकोफॉल मशीन, १२५ जणांना गाय- म्हैस वाटप केली जाणार आहे. याशिवाय, १०० महिला तसेच पुरुषांना मिरची कांडप यंत्र, २०० जणांंना शेळ्यांचे गट अशा सुमारे सव्वाचार कोटींच्या योजना राबविण्यात येणार आहेत. १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलैपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन जि. प. समाज कल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे.

दिव्यांगांसाठी कोणत्या योजना?सामाजिक सुरक्षा व कल्याण अंतर्गत ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगासाठी उपकराच्या ५ टक्के निधीतून विनाअट घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. ४१ दिव्यांगांना या घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शिवाय, निराधार, निराश्रीत किंवा अतितीव्र २५० दिव्यांगांना विनाअट १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता तसेच ३५ जणांना स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप केली जाणार आहे. गरजू दिव्यांगांनीही १५ जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद